सातारा : भाजप आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा अद्याप बाकी असताना सातारा जिल्हातील माण-खटाव विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीतून बंडखोरी झाली आहे. आ.जयकुमार गोरे यांच्या विरोधात एकवटलेल्या आमचं ठरलयं या सर्वपक्षीय गटाकडून भाजपचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष आणि जिल्हा बॅकेचे संचालक अनिल देसाई यांचे नाव निश्चित झाले आहे.याबाबतची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.यावेळी प्रभाकर देशमुख, दिलीप येळगावकर,रणजितसिंह देशमुख, सुरेद्र गुदगे व प्रभाकर घार्गे हे उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस, रासप व इतर पक्षाचे नेते आमचं ठरलंय गटाद्वारे एकत्र आले आहेत व गोरे हटावचा नारा दिला आहे.परंतु,देसाई हे कोणत्या पक्षातून निवडणूक लढविणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.जर जयकुमार गोरे यांना भाजपकडून तिकीट मिळाले तर अनिल देसाई अपक्ष लढणार असल्याची शक्यता आहे.
अनिल देसाई आमचं ठरलंय कडून उमेदवार निश्चित झाल्याने भाजपचे जयकुमार गोरे, त्यांचे बंधू शिवसेना नेते शेखर गोरे अशी तिरंगी लढत रंगणार आहे.अद्याप माण खटावची जागा महायुतीमध्ये कोणाला सुटणार हे निश्चीत झाले नाहिये.त्यामुळे,भाजप कडून जयकुमार गोरे यांना टिकीट भेटल्यास भाजपकडून अनिल देसाई आणि शिवसेनेकडून शेखर गोरे हे बंडखोरी करण्याची शक्यता आहे.यामुळे,जयकुमार गोरे यांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे.
माणमध्ये सर्वपक्षीय गटाकडून अनिल देसाई यांचे नाव निश्चित
RELATED ARTICLES