सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
म्हसवड : देवापुर -म्हसवडला जाणार्या रस्त्यावरील पूल मध्यभागी खचल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे .पुलाखाली टाकलेल्या पाईप जवळील काही भाग वाहून गेला आहे .या रस्त्यावर दिवस रात्र मोठ्या प्रमाणात रहदारी असते.
पुलावरून ये-जा करताना वाहनचालकांना, शाळकरी मुलांना व प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभागाने दुरावस्था झालेल्या या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी, पालक आणि नागरिकांतून होत आहे.
तसेच पुलापासून 300 मीटर अंतरावर देवापुर हायस्कूल असल्याने परगावातून विद्यार्थी सायकलवरून शाळेला येतात.अशातच विद्यार्थ्यांसह वाटसरू व वाहनचालकांची कसरत होत आहे. या पाण्यामुळे ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे पूल बर्याच ठिकाणी खचला आहे. या ठिकाणी पुलाची दुरवस्था झाल्यामुळे या ठिकाणी अपघाताचे केंद्र ठरत असून, या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पुलाच्या ठिकाणचा बराचसा भाग खचून गेला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुलाची व पुलाच्या संरक्षक कठड्याच्या दुरुस्तीबाबत तत्काळ उपाययोजना करावी. तसेच पुलाच्या खाली असणार्या नलिकांच्या संख्या वाढवून चांगल्या दर्जाचा पूल तयार करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
दरम्यान देवापुर ग्रामपंचायत कार्यालयाने खचलेल्या रस्त्याच्या पुलासंदर्भात पत्रव्यवहार करून सुद्धा अद्याप संबंधित विभागाचा एकही अधिकारी फिरकला नाही. पुलावरून वाहणारे पाणी कमी झाल्यावर संबंधित पुलाची डागडुजी करण्याचे आश्वासन दिले असले तरी गेली दोन दिवस पुलावरून पाणी वाहत नसताना संबंधित विभागाचा एकही कर्मचारी अद्याप पाहणीसाठी आला.
देवापुर ओढ्यावरील पूल खचला;
RELATED ARTICLES