नाहीतर शेतकर्यांना खेकडा वाटप आंदोलन करणार – विक्रमबाबा पाटणकर
पाटण : पाटण तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित आहेत. यामुळे अनेक शेतकरी-प्रकल्पग्रस्त देशोधडीला लागले आहेत. निष्क्रिय प्रशासक आणि प्रकल्पग्रस्तांचे बाबतीत असलेला अनादर यामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक धरणे व पाणी असलेला पाटण तालुका आणि प्रकल्पग्रस्त कुटुंब उध्वस्त झालेले असून मानवतेच्या द्रुष्टिकोणातुन पाटण तालुक्यातील धरणग्रस्त- प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आठ दिवसात मार्गी लागले नाहीत तर पुढच्या सोमवारी पाटण तहसील कार्यालयासमोर शेतकर्यांना खेकडा वाटप आंदोलन करणार. कारण खेकड्यांच्यामुळे रोकडा मिळतो. त्यामुळे धरणे फुटतील व शेतकर्यांना त्यांच्या मुळ जमिनी परत मिळतील. व त्यांचा उध्दरनिर्वाह सुरू होईल. असे मत सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व पाटण क्रुषि बाजार समितीचे सभापती विक्रमबाबा पाटणकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
प्रकल्पग्रस्तांना पाण्याची आवश्यकता असताना राज्यकर्ते आणि सनदीअधिकारी स्वतःच्या कारभारामधे व्यस्त असुन यांना प्रकल्पग्रस्त आणि शेतकर्यांची आवस्था पाहण्यासाठी वेळ नाही. निष्क्रिय प्रशासन व अधिकार्यांच्या अनादारामुळे पाटण तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकर्यांची दैनीय अवस्था निर्माण झाली आहे. व व शासकीय अधिकार्यांचा झालेला खर्च शासनाने आठ दिवसात जाहीर करावा अन्यथा प्रकलपग्रस्त त्यांच्या जमिनीमध्ये खेकड्यांची शेती करतील. आपला उध्दरनिर्वाह करण्यास मुक्त राहतील. शेतकर्यांची दारिद्रय कंटाळवाणी जिवणापासुन मुक्तता होईल.
असे सांगून विक्रमबाबा पुढे म्हणाले कोयना धरणग्रस्त प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन काम शासन दरबारी प्रगतीपथावर असुन या कामात महसूल विभागातील अधिकारी हलगर्जीपणा करताना दिसतात. पुढील आठ दिवसात पाटण तालुक्यातील धरणग्रस्त शेतकर्यांचे प्रश्न मार्गी लागले नाहीत तर पाटण तालुक्यातील समस्त प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना पाटण तहसील कार्यालयासमोर खेकडा वाटप करणार शेतकर्यांनी आता खेकड्यांची शेती करुन निर्माण झालेले जादा खेकडे सर्व धरणात सोडावेत. कारण खेकड्यांच्यामुळे रोकडा मिळतो. व धरणे फुटतील धरणे फुटली की शेतकर्यांना त्यांच्या मुळ जमिनी परत मिळतील. व त्यांचा उध्दरनिर्वाह सुरू होईल. असे शेवटी विक्रमबाबा पाटणकर यांनी सांगितले.
प्रकल्पग्रस्त शेतकर्यांचे प्रश्न आठ दिवसात मार्गी लावा
RELATED ARTICLES