सात बारा, खाते उतारा, दाखल्याच्या कामासाठी शेतकरी त्रासले
फलटण : फलटण गावचे तलाठी हे तलाठी कार्यालयात हजर नसल्याने कार्यालयास कुलूप असल्याने गावातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून शेतकरी प्रचंड त्रासले आहेत. सध्या मुलाच्या शैक्षणीक कामासाठी विविध प्रकारच्या दाखल्याची व पीक कर्जासाठी सातबारा व खातेउतारा याची आवश्यकता असल्याने अनेक शेतकरी तलाठी कार्यालयात येत आहेत परंतु यापूर्वीचे तलाठी 8 मे पासून रजेवर गेल्याने फलटण तलाठी कार्यालयाची जबाबदारी ठाकुरकी व फरांदवाडी गावच्या तलाठी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. परंतु गेली वीस दिवस बुरुड गल्ली येथे असणार्या फलटण तलाठी कार्यालात फलटण तलाठी सतत गैरहजर राहत होत्या. दि 27 रोजी अनेक नागरीक कामानिमित्त तलाठी कार्यालयात आले असता त्यांना तलाठी नसल्याने कार्यालयास कुलुप लावलेले दिसले. काही नागरिक मोती चौक येथील रेव्हीनी कार्यालयात ठाकुरकी व फरांदवाडी गावच्या तलाठी कार्यालयात फलटण तलाठी यांचा शोध घेण्यासाठी नागरिक गेले असता या ठिकाणी ही तलाठी नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. फलटण येथील तलाठी कार्यालय बंद असल्याने सात बारा, खाते उतारा, विविध दाखले, विविध नोंदीची कामासाठी हेलपाटे मारून वयोवृद्ध शेतकरी कंटाळुन गेली आहेत.
संबधित तलाठी यांच्या अनुपस्थिती मुळे पिक कर्ज विविध दाखले यापासून वंचित राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. सध्या सुरू असलेली दुष्काळ परिस्थितीमुळे तलाठी यांनी त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी राहण्याची व तलाठी कार्यालयात उपस्थित राहण्याची आवश्यकता असताना तलाठी हजर राहत नसल्याने ग्रामस्तरावरील अडचणीत वाढ होताना दिसत आहे. फलटण तालुक्यातील तलाठी हे तलाठी कार्यालयात हजर नसल्याच्या तक्रारी वाढल्या असून नागरिक व शेतकरी यांच्या तक्रारीकडे महसुल प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने कोणाकडे दाद मागायची हा प्रश्न उभा राहिला आहे.
फलटणला तलाठी कार्यालयात हजर नसल्याने कार्यालयास कुलूप
RELATED ARTICLES