समाधानकारक माहिती न मिळाल्याने नीरा-देवघरचा प्रश्न चिघळणार
फलटण : नीरा-देवघरचे पाणी येथील बागायती पट्ट्यात कधी व किती मिळणार याबाबत पाटबंधारे विभागाने आम्हाला माहिती द्यावी अशी लेखी मागणी केली होती. याप्रमाणे अधीक्षक अभियंता अमोल निकम यांनी तुम्हाला आठ दिवसांत ही माहिती दिली जाईल असे आश्वासन शेतकर्यांना दिले होते मात्र आठ दिवस उलटूनही ही माहिती न दिल्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व आ.दीपक चव्हाण यांनी आज सोमवारी थेट नीरा उपविभागीय कार्यालयात धडक दिली. मात्र तिथे अभियंता अमोल निकम नसल्याने आ. दीपक चव्हाण संतप्त झाले. यावेळी लाभ क्षेत्रातील शेतकर्यांनी कार्यालयात ठिय्या मांडत हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी कर्मचारी झिरपे यांनी निकम यांचेशी चर्चा करून व या पाणी वाटपाबाबत सर्व माहिती गुरुवारी 27 जून पर्यंत लेखी माहिती देऊ असे आश्वासन दिले मात्र ही समाधान कारक माहिती न मिळाल्यास पुन्हा एकदा नीरा देवघरचा प्रश्न चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.
नीरा देवघर चे पाणी नीरा डाव्या काळव्यातून बारामती व इंदापूरला दिलेले पाणी बंद करण्यात आले आहे असे सांगून ते पाणी नीरा उजवा कालव्यात मिळणार आहे असे पत्र शासनाने दिले यामुळे फलटण तालुक्यातील बागायती पट्ट्यातील 36 गावातील लोकांनी ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पाणी वापर संस्थेच्या चेअरमन व सचिवांनी तसेच लाभक्षेत्रातील शेतकर्यांनी हे पाणी आम्हाला वाढवून मिळणार आहे का? मिळणार ते किती मिळणार याबाबत लेखी खुलासा पाटबंधारे विभागाचे अभियंता अमोल निकम यांना बुधवार दि.12 जून रोजी मागितला होता या वेळी अमोल निकम यांनी तुम्हाला सर्व लेखी माहिती आठ दिवसात देतो असे सांगितले होते मात्र आठ दिवस होऊन गेले तरी काहीही माहिती न मिळाल्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, व आ. दीपक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवार दि.24 रोजी सकाळी नीरा उजवा विभागाच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवला.
यामुळे अचानक आलेल्या या मोर्चामुळे तेथे उपस्थित असलेल्या इतर अधिकारी व कर्मचारी यांची चांगलीच तारांबळ उडाली तर अभियंता अमोल निकम तेथे उपलब्ध नसल्याने आ.दीपक चव्हाण हे चांगलेच भडकले तर तेथील एका कर्मचार्याने अमोल निकम यांना दूरध्वनी करून ही माहिती दिली. यावेळी त्यांना आ.दीपक चव्हाण यांनी चांगलेच खडसावले यामुळे आमदार दीपक चव्हाण यांनी नीरा उजवा कालवा विभागाच्या अधिकार्यांवर भडकले यानंतर शेतकरी व लाभक्षेत्रातील लोकांनी घोषणा दिल्या. यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, डी. के.पवार, विलासराव नलावडे, धनंजय पवार, भीमदेव बुरुंगले, दत्ता अनपट, शुभम नलावडे यांच्यासह पाणी वापर संस्थेचे चेअरमन, सचिव सभासद, शेतकरी व तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हक्काच्या पाण्यासाठी शेतकर्यांचे ठिय्या आंदोलन
RELATED ARTICLES