Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीतालुक्यांच्या विकास कामासाठी आठ दिवसात निर्णय घेणार : रामराजे नाईक निंबाळकर

तालुक्यांच्या विकास कामासाठी आठ दिवसात निर्णय घेणार : रामराजे नाईक निंबाळकर

फलटण : तरुण पिढीसाठी यापुढे काम करणार असुन त्यांचे ज्या पक्षात भवितव्य घडेल तथापि सातारा जिल्ह्याच्या भवितव्यासाठी यापुढे निर्णय घेणार असुन जिल्ह्यात अनेक पक्षात उड्या घेणार्‍यांमुळे वाईट संस्कृती फोफावली असुन ती नेस्तनाबुत करणे तसेच दुष्काळी तालुक्यातील सर्वसामान्य लोकांसाठी भविष्यात योग्य असा राजकीय निर्णय घेत फलटण, खंडाळा, माण व खटाव या दुष्काळी तालुक्यांसाठी काम करणार असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले ते फलटण येथील कार्यकत्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
गेली अनेक दिवस सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रात भाजपामध्ये मेगा भरती सुरु आहे.तथापि शिवसेना पक्षातही अनेक कॉग्रेस राष्ट्रवादीचे बडे नेते दाखल होत असताना श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले हे भाजपात डेरे दाखल झाले. सातारा जिल्ह्याचे नुकतेच 3 महिन्यापुर्वी निवडुन आलेले श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहिर करुन सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉग्रेसला जबर हादरा दिला.याच पाठोपाठ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादी कॉग्रेस सोडण्याच्या तयारीत होते.माञ पुढील राजकीय निर्णय घेण्यासाठी त्यांनी आज शुक्रवारी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकत्यांचा मेळावा बोलावला होता. यामध्ये ते शिवसेनेत जातील असा अनेकांनी कयास बांधला होता.माञ श्रीमंत रामराजे यांनी या मेळाव्याला मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, माझ्या राजकीय वाटचालीमध्ये शरद पवार यांचे खुप मोठे योगदान आहे.त्यांनी जिल्ह्यातील अनेक विकास कामांसाठी भरभरुन निधी दिला.महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आंध्र व कर्नाटकला जाणारे तब्बल 81 टीएमसी पाणी अडविण्यात मला यश आले.याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प सुरु असताना केवळ धोम बलकवडीचा प्रकल्प 100 टक्के पुर्ण करण्यामध्ये मला यश आले असुन यापुढे माण खटाव फलटण खंडाळा व उत्तर कोरेगाव या साडे चार तालुक्यांच्या विकासासाठी पुढील 4 वर्ष सत्तेच्या माध्यमातुन काम करावे लागणार असल्याने येणार्‍या 8 दिवसामध्ये पुढील राजकीय निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट मत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. यावेळी त्यांनी चौफेर टीका करीत जिल्ह्यातील राजकीय घडामोडींचा आढावा मांडत असताना उटसुट कोणीही पक्षात उड्या घेऊन पक्ष खराब होत असल्याचे टीकास्ञ रामराजे यांनी केले.
यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले की,माझ्या राजकीय जीवनामध्ये खरे हिरो हे शरद पवार होते व मी राजकारण शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच केले यामुळे मला शरद पवारांना दुखावुन चालणार नाही.मात्र तरुण पिढीसाठी सत्ते वाचुन कार्यकर्ता टीकणार नाही यामुळे निर्णय घ्यावाच लागणार आहे.कधी कधी असे वाटते की, दुष्काळी भागातील तालुक्यांची आघाडी करुन विधानसभेच्या निवडणुका लढवाव्या वाटतात.माञ 1991 साली माझे पहिले भाषण झाले तेव्हा गोंधळलेल्या पिढीचा मी गोंधळलेला नेता होतो.आजही 2019 ला ही असेच वाटते आहे .यामुळे एक तर तरुण पिढीकडे जावे लागेल नाही तर त्यांना आपल्याकडे आणावे लागेल असे मत श्रीमंत रामराजे यांनी मांडले.यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की आपल्या तालुक्यात कोण आपल्या बरोबर घ्यायचे आणि कोणाला नाही हे नंतर बघु असे त्यांनी वक्तव्य केल्यामुळे एकप्रकारे राष्ट्रवादीच्या युवा गटाला लक्ष केल्याने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर लवकरच राष्ट्रवादी सोडून नक्की कोणत्या पक्षात जाणार याबाबत अजुन पत्ते ओपन केले नसल्याने जिल्ह्यात अजुन चर्चा बाकीच राहिली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular