फलटण : पर्यावरणपूरक व उपक्रमशील शाळेचा ठसा उमटवलेल्या दुष्काळी माण तालुक्यातील दुर्गम समजल्या जाणार्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वारुगडने याही वर्षी विविध उपक्रमांनी प्रदूषणमुक्त व फाटकेमुक्त दिवाळी साजरी करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे.
यावेळी विद्यार्थ्यांनी आकर्षक कागदी दिवे बनवले होते. मुलांनी खूप मोठी आकर्षक पानाफुलांची रांगोळी काढून निसर्ग व पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा केली व निसर्गातील जैव विविधता जपण्याचा संकल्प केला. पानाफुलांच्या रांगोळीत बळीराजाची व देश सीमेवर रक्षण करणार्या जवानांच्या स्मृतींची आठवण म्हणून जय जवान, जय किसान व जय निसर्ग असे लिहिले होते.
यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होत्या. त्यात पर्यावरण रक्षण व फाटकेमुक्त दिवाळी हा विषय देऊन चित्रकला स्पर्धा, दिवाळी घोषवाक्ये स्पर्धा, आकर्षक शिव छत्रपतीचे गडकिल्ले बनवून ऐतिहासिक वारसा जपत मुलांनी आपल्या आपल्या संकल्पनेतून गड किल्ले बनवले. यामध्ये सर्व मुलांना पुस्तके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी झेंडू फुलांची शेती यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच समाजातील वंचित उपेक्षित व गरीब व्यक्तींना शाळेच्या वतीने वाटप करण्यात आले.यावेळी शाळेच्या उपशिक्षिका सुनिता गावित यांच्या कार्याचे नागरिकांनी कौतुक केले. शाळेला सुट्टी लागली तरी त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसोबत व पालकांसोबत प्रदूषणमुक्त व फाटकेमुक्त दिवाळी साजरी करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे.त्या दरवर्षी सुट्टीला आपल्या गावी जाण्याआधी हा उपक्रम करूनच आपल्या गावी जातात. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वारुगड जि. प. शाळेची प्रदूषणमुक्त व फाटकेमुक्त दिवाळी साजरी
RELATED ARTICLES