उत्पनाचा दाखला, पेन्शन, शेतकर्यांच्या अनुदानाची कामे रखडली
सातारा : सातारा जिल्ह्यातील महसूल कर्मचार्यांच्या संपाचा फटका जिल्हा प्रशासनाच्या कामकाजाला बसला आहे. जिल्ह्यातील साडेआठशे कर्मचार्यांचा असहकार सुरू झाल्याने दाखले वाटपासह अतिवृष्टी अनुदान वाटपाच्या महत्वाच्या कामांना ब्रेक लागला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रांत व तहसील कार्यालये कर्मचार्यांअभावी ओस पडली असून सर्वसामान्य जनतेची परवड होत आहे. सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त महसूल कर्मचार्यांनी आपल्या 24 प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारलाय. या संपामुळे पेन्शन, उत्पनाचा दाखल्या करता येणार्या सामान्य नागरिकांना मोठे हाल सहन करावे लागतायत. तर अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना मदत करण्यासंबंधीच्या कामावरही याचा परिणाम होतोय. त्यामुळे हा संप कधी मिटणार असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत. पेन्शनच्या कामासाह पुनर्वसन व इतर महत्वाच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येणार्या नागरिकांची प्रचंड अडचण होत आहे.
शुक्रवारी सातारा जिल्हाधिकारी प्रांत व तहसील कार्यालयात चक्कर मारली असता सर्वत्र शुकशुकाट होता. हाताच्या बोटावर मोजण्याइतके कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते. पण महसूल विभागातल्या कर्मचार्यांच्या संपामुळे जिल्हयाच्या कानाकोपर्यातून येणार्या नागरिकांना हेलपाटा पडत आहे. असा हेलपाटा प्रत्येकाला गेल्या दोन दिवसापासून पडत आहे. महसूल कर्मचार्यांच्या संपाची पूर्वकल्पना नसल्याने शासकीय कामांना विलंब होत आहे.
संपामुळे उत्पनाचा दाखला मिळ्ण्यासारखी अनेक महत्वाची कामंही रखडलीत. यातच, हा संप कधी सुटणार याची कुठलीच चिन्ह दिसत नसल्याने सर्वच चिंताग्रस्त आहेत.
महसूल विभागतले वर्ग दोन व तीन सह नायब तहसीलदार अव्वल कारकून ग्रेड पेसह इतर 24 मागण्यांसाठी सध्या संपावर आहेत. सरकारला या प्रकरणी नोटीसही बजावली होती, पण परिणाम काहीच झाला नाही असा संपकरी कर्मचार्यांचा दावा आहे. हे आंदोलन राज्यव्यापी असल्यानं याबाबतचे सर्व निर्णय मुंबईतच होतील असंही हे कर्मचारी सांगतायत.
विदर्भात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी त्रस्त आहेत. शेतीमध्ये झालेल्या नुकसानाच्या सर्वेक्षणाचे काम सध्या सुरु आहे. आस्मानी आपत्तीनं त्रस्त असलेल्या शेतकर्यांना आता संपाच्या निमित्तानं सुलतानी संकटांचा सामना करावा लागतोय.
महसूल कर्मचार्यांच्या संपाचा जिल्ह्यातील नागरिकांना फटका
RELATED ARTICLES