संभाजी ब्रिगेडचे प्राध्यापक श्रीमंत कोकाटे यांची पत्रकार परिषदेत माहिती
सातारा : छत्रपती शिवरायांचे थेट 13 वे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल विरोधी उमेदवारांनी आक्षेपार्ह वक्तव्य करू नये, महाराष्ट्राची जनता ते कधीही माफ करणार नाही. टीका ही लोकशाहीच्या संकेताप्रमाणे असावी उगाच बेताल बडबड करू नये अशी टीका संभाजी ब्रिगेडच्या प्राध्यापक श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केली.
ते पुढे म्हणाले, भारताचे संविधान व राज्यघटना सीबीआय यांची स्वायत्तता पूर्ण धोक्यात आहे. सीबीआयच्या संचालकाची पत्र देऊन रात्री दीड वाजता बदली करण्यात येते अशी बदली ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाची सुध्दा होत नाही. त्यामुळे भारतात लोकशाही धोक्यात आणणार्या भाजप सेना युती व मित्र पक्षाला पुन्हा सत्तेत जाण्यापासून रोखा असे आवाहन कोकाटे यांनी केले. नोटाबंदीमुळे भारताच्या आर्थिक विकासाचा वेग मंदावला. भारतात साखरेचे विकमी उत्पादन झालेले असताना मोदी सरकारने पाकिस्तानातून साखर व आशियाई देशांकडून पंचवीस लाख टन डाळी आयात करण्याचा तुघलकी निर्णय घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशविदेशातील दौर्यांसाठी गेल्या चार वर्षात दोन हजार कोटी रूपये खर्च केले. मात्र कोणतीही थेट परदेशी गुंतवणूक भारतात आली नाही. पत्रकार अयूब राणा यांच्या गुजरात फाईल्स या पुस्तकावर राजकीय हेतूने बंदी घालण्यात आली. न्यायमूर्ती लो या खून प्रकरणात अमित शहा दोषी असल्याचा निरंजन टकले यांचा अहवाल आहे त्यावर सुध्दा शासनाचे थेट भाष्य नाही. दिल्लीमध्ये संविधान जाळणार्या दोषींवर केंद्र सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. सध्या भारतावर मोदी व अमित शहा हे दोन दहशतवादी राज्य करत आहेत. गुजरातेत सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक बिनबोभाटपणे पार पडते.
महाराष्ट्रात छत्रपती शिवराय व डॉ बाबासाहेब आंबेडकर यां स्मारकांच्या उदघाटन सोहळ्यावर नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमुळे दहा कोटी रुपये खर्च झाले मात्र स्मारकांच्या कामांची अडथळ्याची शर्यत सुरू आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचे राज्य आहे. मात्र सातार्यात विरोधकांनी उदयनराजे भोसले यांच्या विरोधात बेताल टीका सुरू केली आहे. महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता या टीकेला कधीही भीक घालणार नाही. त्यामुळे भाजप व सेना युती सत्तेत जाण्यापासून थांबवायला हवे सातारा जिल्ह्याची साथ निश्चित पुरोगामी विचारांना आहे अशी अपेक्षा कोकाटे यांनी व्यक्त केली.
विरोधकांनी उदयनराजे यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करू नये
RELATED ARTICLES