विजही गायब, ग्रामस्थांमध्येे तीव्र नाराजी
सातारा : विलासपूर (ता. सातारा) येथे गेल्या तीन दिवसापासून नळाला पाणी न आल्याने ऐन उन्हाळ्यात नागरीकांना पाण्यासाठी भटंकतीची वेळ आली आहे. दरम्यान, पाण्याचा खडखाटाबरोबरच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची विजेचा पुरवठाही खंडीत झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खंडीत झालेला पाणी पुरवठा पूर्ववत सुरु करावा म्हणून ग्रामस्थांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात येवून कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरले.
याबाबत समजलेली सविस्तर माहिती अशी की, सातारा शहरालगत नव्याने महसूली गावाचा दर्जा मिळालेल्या विलासपूर गावास जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्या अनेक वर्षापासून विलासपूर मधील सर्वच भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. याबाबत अनेक वश्रेाला सरपंच बाळासाहेब पिसाळ, सामाजिक कार्यकर्ते फिरोज पठाण, माजी उपसरपंच कुलकर्णी, ग्रा. पं. सदस्या सौ. प्रतिभा मोटे, पं. स. सदस्य आशितोष चव्हाण, ग्रा. पं. सदस्यांनी जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकार्यांना भेटून तोंडी व लेखी तक्रारी दिल्या होत्या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीतही विलासपूर मधील विस्कळीत पाणी पुरवठा पूर्ववत करावा म्हणून चर्चा करुन मार्ग काढावा, अशी सूचना अधिकार्यांना केली होती. फॉरेस्ट कॉलनीच्या परिसरात जुनी पाईप लाईन काढून नवीन पाईप लाईन टाकणे, पाण्याची गळती काढणे यावर सध्या भर देण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसापासून नळाला पाणीच न आल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटंकतीची वेळ आली आहे. यातच सातार्याचे तापमान 40 अंश डिग्री सेल्सिअसच्या पुढे जावून पोहचले आहे. यामुळे लोकांना उखाड्याला सामोरे जावून पाण्याची शोधाशोध सुरु झाली आहे. ऐन उन्हाळ्यात वीज वितरण कंपनीची वीजही गायब झाल्याने ग्रामस्थांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे.
दि. 23 एप्रिल 2019 रोजी सातारा लोकसभेसाठी मतदान झाले. विलासपूर येथील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. पाण्यासारखी महत्वाची समस्या विलासपूरमध्ये सुटली नसतानाही मतदाराच्या सहनशीलतेचा अंत प्रशासनाने पाहू नये, संबंधित विभागाने वीज व पाण्याची समस्या तातडीने सोडवावी अशी मागणी विलासपूर मधील ग्रामस्थांनी केली आहे.
विलासपूरला तीन दिवसापासून पाण्याचा ठणठणाट
RELATED ARTICLES