पाण्यासाठी शहापूरीकरांचे पाण्यासाठी लाक्षणिक उपोषण
सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून शहापूरी नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा होत नाही. गेल्या वर्षभरापासून पाणी पुरवठा व्यवस्थापण पूर्णपणे कोलमडून गेले आहे. कडक उन्हाळयात शाहूपुरीकरांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. जीवन प्राधिकरणाच्या विरोधात सातारा पंचायत समिती सदस्य संजय पाटील यांनी लाक्ष्मणीक उपोषण छेडले. दरम्यान जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता गायकवाड व शाखा अभियंता वडेर यांच्या बदल्या करुन त्यांच्या जागी सक्षम अधिका़र्यांची नेमणूक करावी, अशी मागणीही यावेळी पाटील यांनी केली.
पंचायत समिती सदस्य संजय पाटील म्हणाले, शाहूपुरी परिसरात सध्या अनेक ठिकाणी पाईपला गळती आहे. त्यामुळे दुषित पाणी मोठया प्रमाणावर पुरवठा होत नसल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत सातत्याने संबंधित अधिकाऱयांना ही परिस्थिती नजरेस आणून देवून देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ताब्यात असलेली वितरण व्यवस्था योग्य पध्दतीने चालवण्याऐवजी अपूर्णावस्थेत असलेल्या नवीन कण्हेर पाणी पुरवठा योजनेच्या वितरण व्यवस्थेला नवीन कनेक्शन जोडून देतो असे सांगत नागरिकांची दिशाभूल अधिकारी करत असल्याचा आरोप संजय पाटील यांनी केला.
शाहूपुरीसाठी कण्हेर पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी एप्रिल 2014 मध्ये कार्यारंभ आदेश काढण्यात आला. ही योजना दोन वर्षात पूर्ण करुन ठेकेदाराने एक वर्ष चालवून नंतर ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करावयाची होती. मात्र ही योजनाच अद्याप पूर्ण झालेली नाही. तसेच यासाठी आणखी काही परवानग्या लागणार असून त्या घेण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची असताना मुख्य कार्यकारी अभियंता गायकवाड व शाखा अभियंता वडेर यांच्या निष्क्रियेतेमुळे त्या परवानगी मिळालेल्या नाहीत. सध्याच्या योजनेतून अर्पाटमेंट व रहिवासी नळ जोडणी देताना त्यांच्याकडून आकारण्यात येणाऱया डिपॉझिटची रक्कम तसेच दिलेले कनेक्शन किती व्यासाचे आहे याबाबत निकष व नियम पाळले जात नाहीत. याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागवून देतील ती अपुरी व संदिग्ध स्वरुपात देण्यात येते. प्राधिकरणाच्या भोंगळ कारभाराचा फटका नागरिकांना बसत नसल्याने प्रचंड नाराजी असल्याने आम्हाला उपोषणास बसावे लागत असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.
उपोषणात संजय पाटील यांच्या शाहूपुरीचे सरपंच राजे, उपसरपंच राजेंद्रशेठ गिरीगोसावी, ग्रामपंचायत सदस्य शंकर किर्दत, आबा यादव, पुरोहित, शितोळे, रमेश धुमाळ तसेच सुरेश साधले, अशोक यादव, राहूल यादव, अनिरुध्द दाभाडे, महेश मोहिते, सावंत, सतीश कदम, संजय ढाणे, नाना जाधव, रमेश साळुंखे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.
प्राधिकरणाचे अधिकारी गायकवाड, वडेर यांच्या बदल्या कराव्यात : संजय पाटील
RELATED ARTICLES