मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा 8.58 टक्क्यांनी जास्त
सातारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचे कोल्हापूर विभागीय मंडळ, कोल्हापूर या विभागाचा इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून जिल्ह्याच्या निकाल 86.23 टक्के लागपा आहे. यंदाही मुलींनी या आघाडी घेतली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीचा निकालात 7.30 टक्के घट झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील 714 माध्यमिक शाळेतील सुमारे 42 हजार 920 विद्यार्थ्यांनी 115 परिक्षा केंद्रावर ही परिक्षा दिली. यातील 42 हजार 630 विद्यार्थी परिक्षेस बसले आणि 36 हजार 761 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यातून पुन:प्रविष्ठ विद्यार्थ्यांची नोंदणी 1 हजार 110 इतकी झाली होती. त्यापैकी 1 हजार 102 विद्यार्थी प्रविष्ठ झाले तर 298 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुन:प्रविष्ठ विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची संख्या 27.04 टक्के आहे.
जिल्ह्यात 22 हजार 751 विद्यार्थ्यांची नोंद झाली. त्यापैकी दहावीच्या परिक्षेसाठी 22 हजार 574 विद्यार्थी प्रविष्ठ झाले. त्यांच्यापैकी 18 हजार 466 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर 20 हजार 169 विद्यार्थीनींची नोंद झाली आहे. त्यातील 20 हजार 56 विद्यार्थीनी उत्तीर्ण झाले. यंदा मुलींच्या तुलनेत मुलांचे उत्तीर्ण होण्याच टक्का अवघा 81. 80 तर मुलींचा पास होण्याचा टक्का 91. 22 टक्के इतका आहे. मार्च 2018चा तुलनात्मक निकाल 93.88 टक्के इतका आहे. त्या तुलनेत यंदा 86.58 टक्के निकाल लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 7.30 टक्के घट झाली आहे.
गतवर्षी सातार्यात 22 परीक्षा केंद्रावर गैरमार्ग झाल्याचे आढळून आले होते. यंदा हे प्रमाण 18 असे आहे. गतवर्षीच्या तुलनेत कॉपी करण्याचे तब्बल 4 प्रकरणे कमी झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.
कॉपी मुक्त परिक्षांसाठी जिल्हा परिषदेच्यावतीने विशेष मोहीम आखली होती. दुर्गम भागातही फिरते पथक ठेवून त्या पथकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर करडी नजर ठेवण्यात आली होती. याविषयी शाळांमध्ये आधीच वातावरण निर्मितीही करण्यात आली होती. एक वेळची कॉपी पुढील शैक्षणिक वर्षासाठी त्रासदायक ठरेल ही भूमिका वारंवार सांगण्यात आल्याचा परिणाम यंदा परिक्षेच्या काळात दिसून आला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा हे प्रमाण घटलेले दिसत आहे. याबरोबरच परिक्षेच्या आधी अर्धा तास वर्गात दाखल होण्याची कडक भूमिका प्रशासनाने घेतल्याचा सकारात्मक परिणामही विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर दिसून आला.
गुणपडताळणीसाठी 10 जूनपासून अर्ज
दहावीची परिक्षा देणार्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांविषयी साशंकता आहे, त्यांनी गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी 10 जूनपासून अर्ज करता येईल. परीक्षेत अनुत्तीर्ण होणार्या किंवा श्रेणी सुधारण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्टमध्ये फेरपरीक्षेची संधी मिळणार आहे.
सातारा जिह्याचा 86.23 टक्के निकाल
RELATED ARTICLES