सातारा : रविवारी दुपारनंतर वळीवाच्या पावसाने वाई, महाबळेश्वरसह सातारा शहरासह उपनगरात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील काही ठिकाणी पाणी साचले, तर गटारे तुडुंब भरुन वाहू लागली. सदरबझार परिसरात एसटी बस व मारुती कारवर वादळी वार्याने झाडाची फांदी पडून दोन्ही वाहनाचे नुकसान झाले. वीज वितरण खांबावरील तार तुडल्याने परिसरात विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. या पावसामुळे वाढलेला उकाडा कमी झाला आहे. सातारा परिसरात काही ठिकाणी उन्हाळी भुईमूग काढण्याचे कामात पावसामुळे व्यत्यय आला.
रविवारी दुपारी तीनच्या सुमारास सारा आसमंत काळ्या कुट्ट ढगांनी व्यापुन गेला आणि दुपारी साडेतीन नंतर टपोर्या थेंबानंी जमीन चिंब ओली केली. वेगाने वाहणारे वारे आणि अधुन मधुन येणारा वीजेचा थरथराट अधिकच गडद होत वीज महामंडळाने लगेचच परिसरातील वीज बंद करुन उकाड्याने ़हैराण केलेल्या सातारकरांना अधिकच घामाच्या धारंानी भिजवून टाकले. आत घामाच्या तर बाहेर पावसाच्या धारा पडताना अनेकांनी वीज मंडळाला वजि गायब केल्याने शिव्यांची लाखोलीच वाहिली. येवतेश्वरचा बंड्या डोगर व आकाशात दिसणारी काळ्या ढगांची दाटी या पावासाची नजाकता अधिकच भीषण करत होती.
मागील तीन महिन्यात एकदाही न पडलेल्या पावसाने सातारकर खूपच ़हैेराण होत. मात्र शनीवार पहाटेच्या वेळेस आणि रवीवारी दुपारी आलेल्या पावसाने मात्र तापमानाचा पारा खाली आणला. त्यातच गडगडणारे ढग आणि अधुन मधुन पडणार्या वीजेचा कल्लोळ अनेकांनी घरातून बसूनच अनुभवला.
जोरदार पावसाच्या मार्याने काही क्षणातच शहरातले प्रमुख रस्ते आस पडले आणि केवळ पाणीच रसत्यातून वाहत जातान दिसत होते. जोरदार धमाका असणार्या पावसाने गारवा तर आणलाच तसेच शहरातील उपनगरासह राधीका रोड, देवी चौक, राजवाडा पालिका परिसरात पाण्याची तळीच निर्माण केली. या पावसाने उन्हाळी भुईंमूग काढणीस व्यत्यय आला तसेच अनेक अद्यापही झाडावर असणारे गावठी आंबे वार्याने पडून आंबा उत्पादक शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले.
सातारा शहराला जोरदार पावसाने झोडपले
RELATED ARTICLES