सातारा : वायु वादळामुळे लांबणीवर पडलेल्या पावसाने आज सातारा शहर व परिसरात सायंकाळी पाचच्या सुमारास वरुणराजाने हजेरी लावली.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार सातार्यात पाच वाजण्याच्या सुमारास पावसाची संततधार सुरू झाली. तब्बल पाऊण तास पडलेल्या या पावसाने हवेतील उकाडा काहीसा कमी झाला होता. वायु वादळाने वरुणराजाचे आगमन लांबणीवर गेले होते. गेल्या चार दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ जाणवू लागली होती. उकाड्याने हैराण झालेल्या सातारकरांना अखेर आज वरुणराजाने दर्शन दिले आणि सातारकर सुखावले. यंदा समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आली असली तरी अजूनही धरण क्षेत्र परिसरात म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे धरणाच्या धरणाची पाणी पातळी खालावलेल्या स्थितीतच आहे. पेरणीच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाही पावसाची वाट आतुरतेने पाहत होता. काही ठिकाणी पेरणी झाली आहे तर काही ठिकाणी अजूनही पेरणी होणे बाकी आहे. त्यामुळे आज झालेल्या संततधार पावसामुळे बळीराजा सह सर्वच जण सुखावले आहेत. हा पाऊस असाच काही दिवस पडावा अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसात विजेचा कडकडाट व वादळी वारे यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र आज झालेल्या पावसा दरम्यान असा कोणताही प्रकार झाला नाही. एकंदरीत वरुणराजाच्या आगमनाने सारेच सुखावले आहेत.
सातार्यात पाऊस
RELATED ARTICLES