वाई मतदारसंघातही राष्ट्रवादीला खिंडारचंद्रकांतदादांच्या उपस्थितीत तिन्ही तालुक्यातील पदाधिकारी भाजपातमुंबई : वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या तिनही तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकार्यांनी मुंबईंत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. या प्रवेशाने राष्ट्रवादीला खिंडार पडले असून याचवेळी ना. पाटील यांनी मदन भोसले सभागृहात दिसणारच, अशी ग्वाही यावेळी दिली. माजी आमदार मदन भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यसैनिक भिलारे गुरुजी यांचे सुपूत्र अशोकराव भिलारे, जि.प. चे माजी समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके पाटील, पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कर्हाडकर, महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक किसनराव शिंदे यांच्यासह महाबळेश्वरचे नगरसेवक सुनिल शिंदे, माजी नगरसेवक प्रशांत आखाडे, मेटगुताडचे माजी सरपंच नंदकुमार बावळेकर, रामचंद्र शिंदे, हेमंत शिंदे यांनी, पाचगणीतील माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक दिलावर बागवान, नगरसेविका उज्वला महाडीक यांनी तर खंडाळा तालुक्यातील प्रदीप क्षिरसागर, अशोक धायगुडे, बबनराव शेळके, हर्षवर्धन शेळके पाटील आणि केंजळ येथील जयप्रकाश जगताप यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी ना. चंद्रकांत पाटील यांनी पक्षाचे उपरणे, दिशादर्शक दिवा व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. ना. पाटील म्हणाले, गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या ताकदीने आणि विश्वासाने काम केले आहे, ज्या धडाडीने निर्णय घेतले आहेत त्यामुळे तमाम जनतेत हेच सरकार पुन्हा सत्तेत येणार हा विश्वास निर्माण झाला आहे. ज्यांना ज्यांना जनतेची नाडी कळते ते सर्वजण त्यामुळेच भाजपात येत आहेत. त्याची प्रक्रिया वाई विधानसभा मतदारसंघातही पार पडली. वाई, खंडाळा व महाबळेश्वरमधील अजूनही अनेकजण आपल्या संपर्कात असून त्यांचाही लवकरच प्रवेश होईल. मदन भोसले यांच्या पाठिशी मुख्यमंत्री व संपूर्ण सरकार ठामपणे उभे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले काम समाधानकारक आहे. त्यामुळे मदन भोसले विधिमंडळाच्या सभागृहात दिसणारच हा शब्द मी तुम्हाला देतो. दरम्यान, ना. पाटील यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाची माहिती यावेळी देवून कोणाला भिती दाखवून पक्षात आणले जात नाही तर लोक स्वत:हून येत असल्याचे सांगितले. मदन भोसले म्हणाले, वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यासह ज्या ज्या ठिकाणचे प्रश्न मांडले ते गतीने सोडविण्यास राज्य सरकारने सहकार्य केले. एवढ्या ताकदीने आणि तडफेने काम करणारे सरकार असेल तर जनतेला दिलासा आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बळ मिळतं. अनेक महत्वपूर्ण तसेच वर्षानुवर्ष रखडलेले प्रश्न सोडविण्याची किमया या सरकारने दाखवली, हेच सरकार आणखी दहा वर्ष सत्तेवर राहिल्यास प्रश्नच शिल्लक राहणार नाहीत, असा विश्वास जनतेत आहे. त्यामुळेच भाजपात येवू इच्छिणार्यांची संख्या वाढत आहे. त्याचा ट्रेलर आज झाला असून लवकरच इतरही अनेकजण भाजपात दाखल होतील. दरम्यान, भाजपा वाई तालुका उद्योग आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दत्ता ढेकाणे यांचा सत्कार ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजपा नेते अनिल जाधव, यशवंत लेेले, तानाजीराव भिलारे, पं. स. सदस्य दिपक ननावरे, वाईचे नगरसेवक सतिश वैराट, निलेश महाडीक, उषाताई ओंबळे, यशराज भोसले, संतोष कवी, चेतन पार्टे, शेखर भिलारे, मधुकर बिरामणे, तीनही तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मदन भोसले यांनी ना. पाटील यांचे स्वागत केले तर राज्य मजूर फेडरेशनचे संचालक सतिश भोसले यांनी आभार मानले. भिलारे स्वत:हून.. कर्हाडकर स्टारलक्ष्मी कर्हाडकर यांच्या प्रवेशावेळी ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, आजच्या कार्यक्रमाचे या स्टार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य तथा माजी आमदार स्व. भिलारे गुरुजी यांचे सुपूत्र अशोकराव भिलारे यांचा प्रवेश झाला तेव्हा ते म्हणाले, भिलारे यांना आपण धरुन, घाबरवून आणलं असं कोणी तरी म्हणले. पण आपण सर्वजण पाहतच आहात, या सरकारने केलेले काम या सर्व घडामोडींना कारणीभूत आहे, असेही त्यांनी सांगितले.
वाई मतदार संघातही राष्ट्रवादीला खिंडार
RELATED ARTICLES