Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीधोम धरणातून दहा हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग

धोम धरणातून दहा हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग

काठावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
वाईच्या कृष्णा माईचा पूर पाहण्यासाठी वाईकरांची तुडूंब गर्दी
वाई : सातारा जिल्ह्यासह संपूर्ण वाई तालुक्यात समाधान कारक पाऊस पडल्याने तालुक्यातील सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत.बलकवडी धरण पूर्ण क्षमतेने 96 % भरले असून बलकवडी धारणा पाठोपाठ धोम धरण सुध्दा 90% भरले आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता धोम धरणातून दहा हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचे धोम पाटबंधारे खात्याकडून सांगण्यात आले आहे.
सध्या धरणात 16 हजार क्युसेस पाण्याची आवक होत असून धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. खंडाळा तालुक्याला दोनशे क्युसेस पाण्याचा विसर्ग कालव्यातून करण्यात आला आहे. त्यामुळे वाईच्या पश्चिम भागातील शेतकर्‍यांमध्ये समाधानाचेवातावरण आहे.पावसाने पुन्हा एकदा समाधानकारक सुरुवात केल्याने सध्यातरी पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याचे चित्र दिसत आहे. वाईच्या पश्चिम भागातील भात हे मुख्य पिक असून ते समाधानकारक व्यक्त करताना दिसत आहे. बलकवडी धरण हे 96% भरल्यानंतर बलकवडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग धोम धरणात करण्यात आल्याने पाण्याची पातळी झपाट्याने वाढून रविवारी धोमधरण पूर्ण क्षमतेने भरल्याचे धोम पाटबंधारे विभागाच्या वितीने जाहीर करण्यात आले. आज धोम धरणाची पातळी 747 मीटर असून 13.3 टीएमसी हे धरण आहे, सध्या धरणात16 हजार क्युसेस पाण्याची आवक असून त्यातून दहा हजार क्युसेस पाण्याच विसर्ग चालू केला आहे. धरणाचे पाचही दरवाजे तीन फुटांपर्यंत उघडले आहेत. त्यामुळे कृष्णा नदीला महापूर आला असून पुराचे पाणी गणपती मंदिराला लागले आहे.
गणपती मंदिराशेजारी असणारा पूल पाण्याखाली जाणार असल्याने या पुलावरील बंद करण्यात आली आहे. कृष्णा नदीला आलेला महापूर पाहण्यासठी वाईकर नागरिकांनी चांगलीच गर्दी केली आहे. धोम पाटबंधारे खात्याकडून काठावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच काठावरील ग्रामीण भाग या शहरातील नागरिकांनी नदी काठावर कपडे धुणे, पाण्यात उतरणे, मासेमारी करणे या सारख्या प्रकारापासून लांब राहण्याची विनंती करण्यात आली आहे. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असून पाऊस न थांबल्यास पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचे हि संबधित विभागाने प्रसिध्द केले आहे. धोम धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने पाण्याचे सर्व प्रश्न निकालात निघाले आहेत. धोम-बलकवडी धरणावर जवळ पास पाच तालुक्यांचे भवितव्य अवलंबून आहे. पावसाने ओढ दिल्याने या सर्व तालुक्यातील खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली होती. बागायती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली होती, ती परतीच्या पावसाने भरून काढली आहे. नागेवाडी धरणक्षेत्रात सुद्धा समाधान कारक पावसाची नोंद झाली आहे. तेही धरण उद्या दुपार पर्यंत भरण्याच्या शक्यता असल्याची माहिती पाटबंधारे खात्याने दिली आहे.
चौकट :- सोमवारी तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर :- गेल्या आठ दिवसांपासून वाई तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस चालू असून ग्रामीण भागातील शाळेमध्ये येणार्‍या विद्यार्थ्यांना ओढे-नाले ओलांडून पावसात शाळेत यावे लागते अतिदक्षतेचीखबर म्हणून पाण्यातून धोकादायक प्रवास करावा लागणार्‍या शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी सोमवारी शाळेला नाही आले तरी चालेल व खबरदारीचा उपाय म्हणून सर्वच शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
– रणजीत भोसले( तहसीलदार वाई)

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular