वाई : वाईच्या पश्चिम भागासह संपूर्ण तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु असून तालुक्यातील अनेक ओढे- नाल्यांची पाण्याची पातळी वाढल्याने शेतात पाणी घुसले असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर कित्येक शेताचे बांध व दगडी ताली ढासळल्याने शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी जमिनी खचण्याच्या घटना घडल्या आहेत.
वेरुळी (ता.वाई) येथील शेतकर्याची जमीन खचली आहे, मांढरदेव पठारावर वसलेलं गाव प्रचंड पावसाच्या अतिदृष्टीमुळे अनेक ठिकाणी जमिनी खचल्या आहेत. युवा नेते विराज भैय्या शिंदे यांनी वेरू्ळी येथे जाऊन सतीश मांढरे या शेतकर्याची जमीन खचली त्याची पाहणी केली. व ताबडतोब विविध खात्यातील अधिकारी यांना सांगून पंचनामा करून शेतकर्यास झालेले नुकसान भरपाई देण्यास सांगितले, तसेच मांढरदेव पठारावर पावसामुळे शेतकर्यांचे झालेले नुकसानीचे पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी वाई तहसीलदार यांना व कृषि विभागाच्या अधिकार्यांना केली. त्यावेळेस विराज शिंदे यांच्यासोबत वेरुळीचे सरपंच दादासाहेब मांढरे, सर्कल, तलाठी, कृषि विभागाचे अधिकारी, पोलिस पाटील दत्ता जाधव, विशाल मांढरे, चंद्रकांत अंबवले, उपसरपंच नितीन मांढरे, सुनील कांबळे, रघुनाथ पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
मांढरदेव परिसरात वेरुळी येथे जमीन खचली
RELATED ARTICLES