वाई : उन्हाची तीव्रता वाढत असतानाच शनिवारी दुपारी 4 वाजता वाई शहर व परिसरात वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसल्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. परंतु अचानक आलेल्या वारा व पावसाने आंब्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढली असून वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामध्येच शनिवार दि. 13 रोजी दुपारी वाई शहरासह तालुक्याच्या काही ठिकाणी जोरदार वारा विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून थोडाफार दिलासा मिळाला असला तरी पाऊसाआधी आलेल्या सोसाट्याच्या वार्यामुळे आंब्याच्या झाडांना नुकतेच लागलेले आंबे व मोहर खाली झडून गेला आहे.
ढगाळ वातावरण असेच राहिल्यास आंबा उत्पादन अडचणीत येईल अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. तसेच जनावरांसाठी ठेवलेला चारा व थोडाफार भिजला असला तरीही नुकसान मात्र झाले नाही. अचानक आलेल्या पाऊसामुळे बाजारपेठेमध्ये व्यापारी व नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. अवकाळी पावसाच्या सरी शहरात जवळपास 15 ते 20 मिनिटे पडत होत्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उन्हाच्या तिव्रतेमधून नागरिकांची थोडी का होईना सुटका झाली आहे.
वाईत विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी
RELATED ARTICLES