फलटण (प्रतिनिधी)- साखरवाडी( तालुका-फलटण) येथील न्यू फलटण शुगर लिमिटेड या साखर कारखान्याच्या थकित उस बिलासंदर्भात ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून उभारण्यात येणारे आंदोलन कारखाना प्रशासनाने 5 सप्टेंबर च्या आत ऊस बिल देण्याचे लेखी जाहीर केल्याने तात्पुरते स्थगित करण्यात आले या प्रश्नी प्रांताधिकारी तहसीलदार यांनी यशस्वी मध्यस्थी केल्याने सध्या तरी आंदोलक शांत झाले आहेत
साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर वर्क्स लिमिटेड या साखर कारखान्याने सन 2017 18 मध्ये गळीतासाठी आलेल्या उसाचे पेमेंट न केल्याने ऊस उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आला होता व्यवस्थापनाकडून मिळणाऱ्या वारंवार खोट्या आश्वासनामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण होते हा असंतोष काल गुरुवार दिनांक 23 रोजी तहसीलदार कार्यालयातील झालेल्या बैठकीत उफाळून आला ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उसाचे पैसे मिळाल्याशिवाय आणि संचालकाविरोधात गुन्हे दाखल केल्या शिवाय येथून हलणार नसल्याचा पवित्रा घेत तहसीलदारांच्या दालनात ठिय्या मांडला होता काही व्यक्तिनी आत्महत्येचा इशारा दिल्याने वातावरण तंग झाले होते शेतकऱ्यांना वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न तसीलदार विजय पाटील आणि स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे करीत होते कारखान्याच्या संचालकांवर गुन्हे दाखल करन्यास तहसील दारानी संमति दिली मात्र पैसे मिळाल्याशीवाय हलनार नसल्याचे आन्दोलकानी स्पष्ट केल्याने गम्भीर परिस्थिति निर्माण झाली होती शेवटी कारखान्याच्या संचालकांना बोलावून घ्या त्यांच्याकडून लेखी स्वरुपात तारीख मिळाल्याशिवाय आम्ही उठनार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा आघाडीचे युवा अध्यक्ष धनंजय महामुलकर आणि तालुकाध्यक्ष नितीन यादव यांनी कारखान्याचे चेअरमन प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्याशी फोनवरून तहसीलदारानी चर्चा करावी ते काय म्हणतात हे जाणून घ्यावे अशी विनंती केल्यावर तहसीलदार विजय पाटील यांनी स्वतःच्या दूरध्वनीवरून प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्याशी ऊस उत्पादक आंदोलन संदर्भात चर्चा केली साळुंखे-पाटील यांनी दिनांक 24 रोजी संचालकांना एक वा चर्चेसाठी पाठवून देतो आणि कधी पेमेंट कधी मिळणार हे लेखी स्वरुपात देतो असे सांगितल्यावर आंदोलक शांत झाले होते आणि निघुन गेले होते
आज दुपारी एकच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या आवारात मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी जमले होते कारखान्याचे संचालक धनंजय साळुंखे-पाटील हे उस उत्पादक शेतकऱ्यांना सामोरे जाण्यासाठी तहसील कार्यालयात आले यावेळी प्रांताधिकारी संतोष जाधव तहसीलदार विजय पाटील फलटण शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रकाश सावंत यांनी धनंजय पाटील यांच्याशी चर्चा करून आन्दोलकांच्या भावना संगीतल्या आणि उसाचे पेमेंट करण्यास सांगितले त्यानंतर सर्वजण बाहेर च्या आवारात ऊस उत्पादकांच्या सामोरे गेले यावेळी प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याने 5 सप्टेंबरच्या आत पेमेंट करतो असे आम्हाला सांगीतले आहे असे स्पष्ट करतानाच त्यांनी जर उसाचे पेमेंट केले नाही तर कारखान्याकडून जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याने उत्पादित केलेली साखर मोलॅसिस जमीन इत्यादी उत्पादनाची विक्री करून रक्कम वसूल करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही असा इशारा दिला यावेळी कारखान्याचे संचालक धनंजय साळुंखे-पाटील यांनी कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे देण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करत आहोत कारखाना अडचणीत असल्याने आम्ही बरेच पर्याय शोधले पण अनेक वेळा अडचणी आल्यामुळे उसाचे पेमेंट करता आले नाही तरीसुद्धा येत्या 30 ऑगस्ट किंवा जास्तीत जास्त पाच सप्टेंबरच्या आत आज कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची देय असलेली रक्कम देणार आहोत कारखाना व्यवस्थापन यासाठी प्रयत्नशील असून कारखाना अडचणीतुन बाहेर काढण्यासाठी आणि पुन्हा चालु करण्यासाठी अनेक कंपन्या आणि व्यक्तिंशी या संदर्भात बोलणे सुरू आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट न मिळाल्याने त्यांना आलेल्या अडचणीची आम्हाला जाणीव आहे त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो पण कोणत्याही ऊस उत्पादकाचे आम्ही पैसे बुडविणार नाही असे धनंजय पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी उपस्थित ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांचे निरासन पाटील यांनी केले यावेळी फलटण कृती समितीचे अध्यक्ष एडवोकेट नरसिंह निकम धनंजय महामूलकर नितीन यादव यांनी पाच तारखेपर्यंत आंदोलन मागे घेत आहोत जर या वेळेत उसाचे पेमेंट मिळाले नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला
यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त नेमन्यात आला होता