सातारा : अॅड वर्षा माडगूळकर, शिरीष कुलकर्णींसह त्यांच्या बगलबच्यांना अटक करा व त्यांच्या मालमत्तांची विक्री करुन ठेवीदारांची देणी द्या, अशी मागणी करीत जिजामाता महिला बँकेच्या ठेवीदारांनी आज सातार्यात मोर्चा काढून जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधकांसह सहकार मंत्र्यांनाही मागण्या पूर्ण करण्याचे निवेदने दिली. तसेच मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर यांच्या नेतृत्वाखाली हा लढा यशस्वी करण्याचा निर्धारही व्यक्त केला.
अनियमित कामकाज व पैश्यांच्या अफरातफरीमुळे येथील जिजामाता महिला सहकारी बँंकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणल्याने ही बँक बंद पडली आहे. स्थानिक बँक आहे व जादा व्याजदर मिळतो या आमिषाने हजारो ठेवीदारांनी या बँकेत ठेवलेल्या ठेवी अडकून पडल्याने अडचणीत आलेल्या व हवालदिल झालेल्या ठेवीदारांनी संदीपदादा मोझर यांच्या नेतृत्वाखाली आज सातार्यात जाहीर मोर्चा काढून संतप्त ठेवीदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या संपूर्ण जिल्हयातून आलेले ठेवीदार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात एकत्रित आले.
प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारावकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दरम्यान, सहकारमंत्री सुभाषराव देशमुख शासकीय विश्रामगृहात आल्याचे समजल्यावर सर्व ठेवीदार संदीपदादांच्या नेतृत्वाखाली विश्रामगृहाकडे गेले. तेथे त्यांनी ना. देशमुख यांना मागण्याचे निवेदन दिले व आपल्या भावना तीव्रपणे व्यक्त केल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापासून सर्व आंदोलक पोवई नाक्यावर शिवतीर्थावर गेले. तेथे छत्रपती शिवरायांच्या पुतळयास संदीपदादांसह ठेवीदारांच्या प्रतिनिधींनी पुष्पहार अर्पण केला. तेथून मोर्चा जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर गेला व तेथे जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम यांना निवेदन दिले. तिथे आंदोलकांना मार्गदर्शन करताना संदीपदादा मोझर म्हणाले की, ठेवीदारांच्या पैश्यावर ऐशोआराम करणार्या आणि अपहार करुन मोकाट फिरणार्या वर्षा माडगूळकर, शिरीष कुलकर्ण्ी या दामपत्याला अटक झाल्याशिवाय ठेवीदार स्वस्थ बसणार नाहीत. त्यांच्या बगलबच्च्यांसह जिजामाता बँक परिवारातील संस्थांना दिलेल्या देणग्या व बेकायदा निधी वर्ग करण्याच्या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी व संबंधितांच्या मालमत्ता जप्त करुन ठेवीदारांची देणी सव्याज दयावीत. अन्यथा बँकेच्या भ्रष्टाचारी पदाधिकार्यांना पाठीशी घालणार्या अधिकारी, मंत्री व शासकीय यंत्रणेची पर्वा न करता मुंबईत मंत्रालयावर मोर्चा, उपोषण, ठिय्या धरणे आदी आंदोलने करावी लागतील.
जिजामाता साखर करखान्याच्या विक्रीतून माडगूळकर दाम्पत्याला 20 कोटी रुपये ऑनपेपर मिळाल्याची पक्की माहिती असून, त्या पैश्यातून ठेवीदारांची देणी दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असे सांगून बँकेवर प्रशासक नेमावा व ठेवीदारांच्या नावावर दाखवलेल्या बोगस कर्ज प्रकरणांची चौकशी करुन संबंधितांवर कायदेशीर करवाई करावी, अशी मागणीही संदीपदादांनी त्यांच्या भाषणात केली. आपल्या घामाची कमाई, आयुष्यभराची पुंजी जिजामाता बँकेत अडकल्याने अनेकांना औषधोपचारासाठी पैसे उपलब्ध नाहीत. अनेकांची घराची बांधकामे, मुलंाची शिक्षणे, लगन कार्य रखडली आहेत. कित्येकांना रोजचे दोन वेळचे अन्न मिळणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे गंभीर फौजदारी गुन्हे दाखल असूनही मोकाट फिरणार्या वर्षा माडगूळकर व त्यांच्या कुटुंबिय, निकटवर्तिय व संचालकांना पहिल्यांदा ताब्यात घ्यावे व त्यांच्याविरोधात कायदेशीर लढाई लढून ठेवीदारांना न्याय दयावा, अन्यथा एका महिन्यात आंदोलन आणखी तीव्र स्वरुप धारण करेल, असा इशाराही संदीपदादा मोझर यांनी त्यांच्या भाषणात दिला.
अॅड. धीरज घाडगे यांनीही त्यांच्या भाषणात जिजामाताच्या ठेवीदारांना त्यांची घामाची ठेव परत मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे सांगून संदीपदादाच्या माध्यमातून ठेवींदारांना निरपेक्ष वृत्तीचा कणखर सेनापती मिळाला आहे. आजवर त्यांनी हाती घेतलेली सर्व आंदोलने यशस्वी झाली असून हा लढा सुध्दा ठेवीदारांच्याच बाजुने यश मिळवेल. अशी खात्री असल्याचा उल्लेख केला. बुध्दीभेद करण्याचा व फोडा – झोडा नीतीने ठेवीदारांमध्ये संभ्रम निर्माण करणार्यांच्या विकृत प्रचाराला बळी न पडल्याने आवाहनही केले. ठेवीदारांच्या कोअर कमिटी सदस्यांसह खेडच्या उपसरपंच सुशिलाताई मोझर, ज्येष्ठ नेते वासुदेवकाका माने, मनसेचे जिल्हा सचिव सागर पवार, चंद्रकांत पवा मनसे जनहित कक्षाचे जिल्हा संघटक मनोज माळी, उपजिल्हाध्यक्ष महेश जगताप, तात्यासाहेब थोरात, अश्विन गोळे, पाटण तालुकाध्यक्ष गोरख नारकर, मधुकर जाधव, संदीप जाधव, सुशिल कदम, दत्ता कारंजकर, चंद्रकांत बामणे, प्रकाश देसाई, सुधीर बुधावले, अधिक सावंत, भानुदास दाईंगडे, अमोल कांबळे, अमित यादव आदींसह प्रमुख पदाधिकारी, महाराष्ट् सैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.