Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीशासनकर्ते हो सावधान...... कोयना धरणग्रस्त मुख्यमंत्र्यांच्या भेटीला मुंबईला चालत निघणार ; ...

शासनकर्ते हो सावधान…… कोयना धरणग्रस्त मुख्यमंत्र्यांच्या भेटीला मुंबईला चालत निघणार ; 17 व्या दिवशी आंदोलकांचा निश्चय

पाटण:- कोयना धरणग्रस्त आंदोलकांना मुख्यमंत्र्यांनी बैठकीची तारीख दिल्याशिवाय उठणार नाही. आंदोलन स्थळावर जशी होळी आणि होळीचे सर्व सण साजरे केलेत तसे आता गुढीपाडवा आंदोलन स्थळावर साजरा करून आंदोलक पायी मुख्यमंत्र्यांच्या भेटीस मुंबईस निघणार असा निर्धार आंदोलकांनी केला असून मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली औपचारिक बैठक जाहीर झाल्याचे पत्र शनिवार पर्यंत आले नाही तर रविवारी पाडाव्याची गुढी उभारून सोमवारी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला धरणग्रस्तच जायला सुरुवात करतील. हजारोंच्या संख्येने धरणग्रस्त स्त्री पुरुष 19 मार्च रोजी मुंबईच्या दिशेने चालायला लागतील. असा निर्णय आज कोयनानगर येथील ठिय्या आंदोलनात डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी घेतला.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ भारत पाटणकर यांनी हा प्रस्ताव मांडल्यावर ठिय्या आंदोलनातील हजारो स्त्री पुरुषांनी हात वर करून एकमताने निर्णय घेतला. आजपासून मुंबई लॉंग मार्च पोहोचणार असल्याची माहिती सर्व गावातून मुंबईला कामाला असलेल्या चाकरमान्यांना कळवावे असे ठरले. सभेला संबोधित करताना डॉ पाटणकर म्हणाले विद्यमान खासदार, आणि विद्यमान आमदार या दोन्ही लोकप्रतिनिधींनी आणि पाटण तालुक्यातील दोन्ही लोकप्रतिनिधीं आणि पाटण तालुक्यातील माजी आमदारांनी आंदोलनाला भेटी देऊन मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन कोयना प्रकल्प ग्रस्ताचे प्रश्न सोडविण्याचे आवाहन केले आहे. असे असून सुद्धा जर बैठकीची तारीख मिळत नसेल तर हा केवळ कोयना प्रकल्प ग्रस्तानचाच न्हवे तर सातारा जिल्ह्यातील एकंदर जनतेचा अवमान आहे. मुख्यमंत्र्यांनी अजून ही गंभीरपणे विचार करून ताबडतोब बैठकीची तारीख द्यावी आमची चळवळ राग ओकणारी चळवळ नसून शांततेच्या मार्गाने राग ओकणारी चळवळ जनतेच्या मोठ्या संख्येने सहभागी असणे आणि शांत तेच्या मार्गाने चळवळीचे स्वरूप ठरविणे यातच श्रमिक मुक्ती दलाच्या चळवळीची ताकत आहे. जनतेने संख्या वाढवावी जिद्ध चिकाटी वाढवावी. आणि मुंबईकडे होणारा लॉंग मार्च हा विजयाकडे होणारी वाटचाल आहे. याची खात्री बाळगावी,
लॉंग मार्च जसा फुडें जाईल तशा तशा टप्याने श्रमिक मुक्ती दलाच्या चळवळीतील विविध प्रकारचे शेतकरी, शेतमजूर, श्रमिक जनता लॉंग मार्चची संख्या वाढविण्यात येईल. आणि कोयना धरण ग्रस्ताची ही चळवळ आम जनतेची चळवळ बनेल. हे निश्चित आहे . बड्या बड्या भांडवलदारांची लाखो कोटींची कर्जे रद्द करण्याऱ्या कोयना धरण ग्रस्ताच्या न्याय मुद्द्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. राज्य जनतेच्या आधारावर चालते. भांडवलदारांच्या आधारावर न्हवे याची जाणीव सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी ठेवणे गरजेचे आहे. कोयना धरणग्रस्ताची शक्ती एवढी प्रचंड आहे. की त्यांना न्याय न दिल्यास कोणतेही मंत्रिमंडळ शिवसागर जलाशयात विसर्जित झाल्या शिवाय राहणार नाही. आजवर सगळ्याच सरकारनी कोयना प्रकल्प ग्रस्थानकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्यांना वंचित ठेवण्यात सर्वच राज्यकर्त्यांचा सहभाग आहे. अशी कोयना धरण ग्रस्ताची भावना आहे. असे सर्व आजी माजी राजकर्त्यांनी लक्षात ठेवावे. यावेळी हजारोंच्या संख्येने पाटण,जावळी,महाबळेश्वर, कराड येथील प्रकल्प ग्रस्त उपस्थित होते. आणि या लॉंग मार्च मध्ये हजारो प्रकल्प ग्रस्त महिला मुले आणि वृद्ध सहभागी होनार आहेत.
महाराष्ट्राला ज्या कोयनेने वीज दिली. ज्या कोयनेच्या पाण्याच्यावर पश्चीम महाराष्ट्रातील सहकार आणी सहकारातील तीन पिढ्याचे नेत्रुत्व पोसले. अशा धरणाचे विकास पुरुष व स्त्रीया आपल्या मागण्या घेवून गेले पंधरा दिवस श्रमिक मुक्ती दलाच्या नेत्रुत्वाखाली हजारोच्या संख्येने ठीय्या मारुन धरणा जवळ बसले आहेत. याच पाण्याच्या जिवावर सहकारातून तयार झालेल्या बलदंड नेत्रुत्वाने सत्तेमधे केवळ भागीदारीच केली नाही तर त्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. असे नेत्रुत्व बेइमानी निघाले. त्यामुळेच या धरणग्रस्तांना आक्रोश करावा लागत आहे. हाआक्रोश सत्ताधा-यानी लक्षात घेवून तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. नाहीतर विकासासाठी बलीदान द्यायचे बळीराजाने आणी त्याची फळे चाखणार टाटा, अदानी, अंबानी ही विकासाची उफराटी रीत मोडून काढावीच लागेल. असा निर्धार देखील आंदोलकांनी यावेळी केला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular