पाटण:- कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह परिसरात पावसाचा जोर अद्याप कायम असून कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात सध्या ८० हजार क्युसेक प्रतीसेकंद पाण्याची आवक सुरु आहे. तर धरणातील पाणीसाठा ९० टीएमसी झाला आहे. धरणातील पाण्याची वाढलेली आवक व पाऊसाचे प्रमाण पहाता पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी शनिवारी दुपारी १ वा. धरणाचे वरील सहा वक्र दरवाजे २ फुटाने उघडून ११,४२७ क्युसेस पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. मात्र वाढलेला पाऊस धरणात येणारे पाहता दुपारी ४ वा. धरणाचे दरवाजे दोन फुटावरुन तीन फुटावर करण्यात आले. तर धरण पायथा विजग्रहातुन २१०० क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. असे एकुण २० हजार क्युसेस पाणी प्रतिसेकंद नदीपात्रात येत आहे. या पाण्याने नदीच्या पात्रात वाढ होत असून कोयना-क्रुष्णा नदी काठावरील २३८ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शनिवार दि. ३ आॅगस्ट रोजी सकाळी. ८ वा. कोयना धरण ८८% भरले असून धरण भागात पावसाचा जोर कायम आहे. वाढत्या पाऊसाचे प्रमाण आणि कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पहाता शनिवारी दुपारी १.०० वा. सुमारास कोयना धरणाचे वरील सहा वक्र दरवाजे दोन फुटाने उचलून नदी पात्रात प्रतिसेकंद ११,४२७ हजार क्युसेस तर पायथा विजग्रुहातून २,१०० हजार क्युसेस आले होते. मात्र वाढलेला पाऊस धरणात येणारे पाण्याची आवक पाहता दुपारी ४ वा. धरणाचे दरवाजे दोन फुटावरुन तीन फुटावर करण्यात आले.असे एकुण १९ हजार क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. पूढील पर्ज्यन्यमानानुसार विसर्गामध्ये आवश्यकते नुसार बदल होऊ शकतो. असे मुख्य कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी सांगितले. या पाण्याने नदीच्या पात्रात वाढ होत असून कोयना-क्रुष्णा नदी काठावरील २३८ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर कोयना धरणापासुन पाटण २५ कि.मी. अंतर पर्यंत पाणी पोहचण्यास ६ ते ८ तास, कराड ६० कि.मी. अंतर पर्यंत पाणी पोहचण्यास १६ ते १८ तास, सांगली १३५ कि.मी. अंतर पर्यंत पाणी पोहचण्यास २८ ते ३० तास लागणार आहेत.
कोयना धरणाच्या खालील भागातील नदीकाठची शहरे, गावे, वाड्या ,वस्त्यामध्ये राहणाऱ्या नागरीकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रामध्ये प्रवेश करू नये.
नागरिकांनी सतर्क रहावे.पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल आलोंडू नये. वीजेवरील मोटारी, इंजिने शेती अवजारे अथवा तत्सम साहित्य तसेच पशुधन यांचेही सुरक्षिततेची काळजी घेऊन कोणत्याही प्रकारे जिवीत वा वित्त हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन कोयना धरण व्यवस्थापन आणि महसूल विभागाने केले आहे.