म्हासुर्णे (प्रतिनिधी तुषार माने) : मल्हारपेठ-पंढरपूर राज्य मार्गावरील म्हासुर्णे गावातील हद्दीतील रस्त्यांच्या साईट पट्टया खचले मुळे रस्ता अरुंद झाला आहे त्यामुळे या रस्त्यावरुन जाणार्या वाहनांचे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे.
काही दिवसापुर्वी या रस्त्याच्या साईट पट्टया ग्रामपंचायतीने पुढाकार भरल्या होत्या.परंतु आताच्या पावसामुळे या रस्त्याच्या साईटपट्टया पुर्णपणे खचलेल्या आहेत.
तरी याबाबत म्हासुर्णे ग्रामपंचायतीने संबंधित बांधकाम विभागाला वारंवार सांगुनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे या विभागांला ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.
तरी या रस्त्यावरुन अवजड वाहतुक मोठ्याप्रमाणात होत असते त्यामुळे इतर वाहनांना रस्ता खाली उतरताना कसरत करावी लागते. तर लहान वाहने डांबरीकरणाला खालुन थटत आहेत.त्यामुळे अनेकजणांच्या वाहनांचे घोटाळे झाले आहेत. तरी या रस्त्यांवरील साइडपट्ट्या भरण्याचे काम सुरू करण्यात यावे अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे .
म्हासुर्णे हद्दीत साईड पट्या खचल्यामुळे अनेक वाहनधारकांना रस्त्यावर वाहने चालवताना काट्यावरील कसरत करावी लागते.वाहने चालवताना मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले आहे खंड्यामुळे दुचाकी वाहनांच्या अपघातात वाढ होत आहे त्यामुळे लोकांच्या व वाहधारकांच्यांमध्ये नाराजीचा सुर आहे तरी संबंधित विभागाने तत्परतेने उपाय योजना कराव्यात अन्यथा आम्हाला वेगळा मार्ग स्विकारावा लागेल
सचिन माने
सरपंच ग्रामपंचायत म्हासुर्णे
मल्हारपेठ ते पंढरपूर रस्त्यावर म्हासुर्णे हद्दित रस्त्यावर खड्डे आहेत पण जास्त साईड पंट्या खचल्यामुळे अवजड वाहने रस्त्यावरून खाली उतरत नसल्यामुळे छोटे वाहन धारक व दुचाकी वाहन धारकांना मोठी वाहन चालवताना कसरत करावी लागते.काही ठिकाणी तर बरेच अपघात पण झालेले आहेत अशा घटना वारंवार घडत आहेत तरी ताबडतोब संबंधित विभागाने लक्ष घालुन प्रश्न मार्गी लावावा अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल.
तुषार माने
ग्रामपंचायत सदस्य म्हासुर्णे
अध्यक्ष – भैरवनाथ शेतकरी मंडळ म्हासुर्णे