पाटण – विक्रमसिंह पाटणकर दादांनी मला प्राण जरी मागितला असता तरी तो मी हसत – हसत दिला असता. पुत्रप्रेमापोठी माझ्यावर अविश्वास ठराव दाखल करून काढण्यापेक्षा ज्या सन्मानाने सभापती केल त्या सन्मानाने राजीनामा मागायचा होता. तोहि सहज दिला असता. ज्यांच्या सन्मानासाठी गेली ३५ वर्ष काम केल त्यांच्याकडूनच अशा पध्दतीने अपमानास्पद वागणुक मिळेल अस स्वप्नात देखिल वाटल नव्हतं. माझ्यावर जो अविश्वासाचा ठराव पारित झाला हे कायद्याला व राजकारणाला धरुण अभिप्रेत नव्हता त्याची वस्तुस्थीती बाहेर यावि अशी मागणी जिल्हा परिषदेचे माझी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी करत आपली पुढील राजकीय वाटचाल आपल्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन करणार असल्याचे त्यांनी पाटण येथील पत्रकार परिषदेत सांगितले.
पाटण येथील विश्रामग्रहावर आयोजित पत्रकार परिषद घेण्यात आली त्या वेळी ते बोलत होते ते पुढे म्हणाले की गेले ३० ते ३५ वर्ष विक्रमसिंह पाटणकंराचे बरोबर प्रामाणिक व एक निष्ठेने राजकारण केले आहे हे जिल्हासह महाराष्ट्राला माहीत आहे मी पाटणकर गटाला व पक्षाला त्रासदायक गोष्ट. असे काही केले नाही कीवां कोणत्याही विरोधी पक्षासी हात मिळवणी केली नाही विक्रमसिह पाटणकराण साठि जिवाला.जिव देणारा कार्यकरता आहे त्यानी आपणास जरी प्राण मागीतला असता तर तो हसत हसत मी दीला असता. मात्र असे १९ तारखेला मला रात्री आठ वाजता निबंधकांचे.कडुन पत्र येते.की उद्या तुमच्यावर अविश्वासाचा ठराव आहे मग अविश्वास अचानक आनण्याची वेळ का आली.
आज पर्यंत आपण ३५ वर्ष एक निष्ठेने आहोरात्र काम केले त्यानां अशा प्रकारे अपमानास्पद अशी वागणुक मिळेल असे मला.स्वपनात ही वाटले नव्हते ते पुढे म्हणाले कि मी कृर्षि उत्पन बाजार समीतीचा सभापती झालो तेव्हा पधंरा लाख रुपये तोट्यात असनारी बाजार समीती आज १० लाख रुपये नफ्यात आनली. ठरावात संचालकाना विश्वासात घेत नसल्याचा माझ्यावर आरोप केला मग हा आरोप माझ्या समोर संचालकानी केला तर आपण राजकारणातुन संण्यास घेवु. मला तुम्ही सन्मानाने सभापती केले असून तुम्ही म्हणाला असताकी राजीनामा द्या तोही मी सन्मानाने दीला असता मग राजीनामा का मागितला नाही. हा अविश्वस आणण्याची काय गरज होती असे ते म्हणाले
– अविश्वासाचा ठराव झाले पासुन व आज वर्तमान पत्रात आलेल्या बातमी वाचुन.आनेक लोकांचे आपनाला फोन आले ते ही म्हणतात असे का दादानी केले या बाबत त्यानाच विचारा असे आपण कार्यकरत्याना सांगितले असुन पुढील वाटचाल लोकानांच विचारुण करणार असल्याचे त्यानी या वेळी सांगितले