औंध: विद्यार्थी शैक्षणिक सुविधेपासून वंचित राहु नये यासाठी खटाव तालुक्यातील प्राथमिक शाळांमधील शंभर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेशाचे वाटप मुंबई येथील स्व.तात्यासाहेब घाडगे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले.
यावेळी मोळ, डिस्कळ, ललगुण, विठ्ठलवाडी, चिंचणी येथील प्रज्ञावंत व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप ग्रीनसाँन कंपनीचे चेअरमन धनंजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना धनंजय पाटील म्हणाले की, ग्रामीण भागात अजूनही पैशाअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी प्रतिष्ठान मार्फत राबविण्यात येत असलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून येत्या काही काळात अशा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सागर घाडगे यांनी प्रतिष्ठान मार्फत राबविल्या जाणार्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. यावेळी मंदार शेटे, संजय कदम, राहुल बर्गे, सागर घाडगे, अनिल कदम, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.
स्व.तात्यासाहेब घाडगे प्रतिष्ठानमार्फत विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप
RELATED ARTICLES