औंध: खटाव तालुक्यातील कळंबी केंद्रसमूहातील 15 शाळांच्या 177 विद्यार्थ्यांना स्व.तात्यासाहेब घाडगे प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले त्यामुळे 15 शाळांतील विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला.
यावेळी प्रतिष्ठानचे सारंग घाडगे, सचिन घाडगे, सरपंच अनिल खरात,अनिल सूर्यवंशी, हरिदास सावंत, राजेंद्र फडतरे, सागर करे, उदय घाडगे केंद्रसमूहातील शाळांचे मुख्याध्यापक यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सारंग घाडगे म्हणाले की, ग्रामीण भागातील मुलांना शहरी मुलांच्याप्रमाणेच शैक्षणिक साहित्य, सुविधा उपलब्ध करून त्यांची शैक्षणिक गोडी वाढावी या उद्देशाने तसेच हुशार विद्यार्थी शैक्षणिक साहित्यविना वंचित राहू नये यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे, व यापुढे यापेक्षाही जास्त विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य देणार असल्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.
सचिन घाडगे यांनी प्रास्ताविक केले तर सागर करे यांनी आभार मानले.
कळंबी केंद्रसमूहातील 177 विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप
RELATED ARTICLES