भेकवली: धुक्यात हरवलेलं महाबळेश्वर तुम्ही अनेकदा पाहिलं किंवा अनुभवलं सुद्धा असेल परंतु धुळीत हरवलेलं महाबळेश्वर तुम्ही पाहिलंय का? असा प्रश्न पडल्या शिवाय राहत नाही.त्याला कारणही अगदी तसंच आहे. महाबळेश्वर ते सातारा या महत्त्वाच्या मार्गावरून उडणारी धूळ.सध्या या धुळीचा सामना स्थानिक आणि येथे येणार्या पर्यटकांना देखील करावा लागतोय.
महाबळेश्वर ते सातारा हा रस्ता राज्यमार्ग क्रं.139 चा महत्त्वाचा टप्पा समजला जातो. सदर रस्त्यावरील दिवसेंदिवस वाढती वाहतुक पाहता केंद्रसरकारने या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुती करणासाठी परवानगी दिली आहे. सध्या काम युद्ध पातळीवर सुरु देखील आहे.
परंतु महाबळेश्वर ते टेकवली रस्ता संबंधित ठेकेदाराने गेल्या दोन ते तीन महिन्यानपासून मशिन द्वारे फक्त खोदुन ठेवल्या कारणाने रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झालेची पहायला मिळते. सदर रस्त्यावरून दैनंदिन प्रवास करणारे प्रवाशी विशेषतः दुचाकीस्वार तर अक्षरशः धुळीच्या त्रासाने हैराण झालेले आहेत.
दोन वर्षांपूर्वी पासुन महाबळेश्वर ते मेढा रस्त्याची दयनीय अवस्था झालेली पहायला मिळत आहे.अगोदरच खड्ड्यांमुळे वैतागलेल्या वाहन धारकांना आत्ता या धुळीचा त्रास सहन करावा लागतो आहे. या रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे आतातरी रस्ते खड्डेमुक्त होतील अशी आशा प्रवाशी यांना होती.पण प्रत्यक्षात कामाला सुरुवात होऊन देखील रस्त्याचे काम काही महिन्यांनपासून मंदावल्याने वाहनधारकांन कडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
सतत उडणार्या धुळीमुळे डोळ्यांचे व घश्याचे विकार नागरिकांना सताऊ लागले आहे. काही दुचाकीस्वरांनी तर सततच्या ह्या त्रासाला पर्याय म्हणून आपला मार्गच बदललेला आहे.त्यामुळे रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी स्थानिक आणि पर्यटकांन मधुन जोर धरू लागली आहे.
महाबळेश्वर मेढा रस्त्यावर धुळीचे साम्राज्य
RELATED ARTICLES