कराड : ओगलेवाडीच्या पुलाजवळ दोन विजेचे खांब धोकादायक स्थितीत आहेत. तर काही लोखंडी खांब गंजलेले आहेत. त्यामुळे त्यांची स्थिती वाकडे तिरकी झाली आहे. येणार्या पादचार्याचा कधी बळी जाईल सांगता येत नाही. विद्युत वितरण कंपणीकडुन याची त्वरीत दखल घेण्यात यावी, अशी मागणी नागरीकातुन होत आहे.
कराड रेल्वे स्टेशनवरून पादचारी कोयना सायडिंगमार्गे रेल्वेपलावरून उतरतात कारण हे जवळचे अंतर आहे. तेथे जवळच सातारा जिल्हा परिषदेची प्राथमिक मराठी शाळा आहे. या शाळेत जवळपास 300 मुले मुली शिक्षण घेत आहेत. शिवाय तेथे जवळच रेल्वे कामगारासाठीचा माल धोका आहे शिवाय इतर ठिकाणी रात्री दिवसा रेल्वेचे कामगार ये-जा कारतात शिवाय रेल्वे स्टेशनरवरून पुलाखालुन हम रस्ता आहे. या ठिकाणीच काही रस्त्यालगत चहाच्या टपर्या हॉटेल्स आहेत. या ठिकाणीच दोन गंजलेले लोखंडी वाकलेले खांब आहेत. या खांबावरील विद्युत वाहक तारा लोंबकळत आहेत. तेंव्हा येणार्या जाणार्या पादचार्यांचा केंव्हा बळी जाईल हे सांगत येत नाही ही दुर्घटना घडण्याची वाट पाहण्या अगोदर वीजमंडळाने गजलेले लोखंडी खांब त्वरीत हटवावेत अशी मागणी नागरिकातुन होत आहे.
वीज कंपनीने वाकडे, गंजलेले खांब बदलावेत:नागरिकांची मागणी
RELATED ARTICLES