कराड: राज्यातील सहकार चळवळीची मुहूर्तमेढ काँग्रेसने रोवली. यशवंतराव चव्हाण यांच्या कृषी-औधोगिक समाजरचनेच्या धोरणातून सहकाराचा जन्म झाला. यातूनच बहुजन समाजाला नेतृत्व करण्याची संधी मिळाली. राजकीय नेतृव स्वाभाविकपणे यातूनच उभी राहिली. पण त्या नेतृत्वांनी आपल्या राजकीय ध्येयासाठी या सहकाराला आजारी पाडले. आणि त्यातून सत्तेचे राजकारण सुरु केले. सहकारातून सत्ताकारण हे त्यांचे एकमेव ध्येय आहे. त्यांना समाजाच्या सुख व दुःखाचे काही घेणे-देणे नाही. हे ओळखून कापील-गोळेश्वर विभागातील जनतेने मागील विधानसभा निवडणुकीचा इतिहास कायम राखावा. असे आवाहन कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
कापील-गोळेश्वर (ता. कराड) परिसरात त्यांनी आज (सोमवारी) प्रचार दौरा केला. यावेळी ते बोलत होते. जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, अजितराव पाटील-चिखलीकर, मनोहर शिंदे, जयेश मोहिते, पै. नानासाहेब पाटील, नरेंद्र नांगरे-पाटील, शिवाजीराव मोहिते, वैभव थोरात, संभाजीराव थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. चव्हाण म्हणाले, कापील आणि गोळेश्वरला आदर्श पाणीयोजना झाल्या, याचे समाधान वाटते. शुद्ध पाणीपुरठ्यामुळे या विभागात रोगराई कमी होईल. मी मुख्यमंत्री असताना कराड दक्षिणेतील मंजूर केलेल्या कामांना सरकार बदलल्यानंतर निधी मिळणार नाही, अशा वलग्ना व्हायच्या. पण त्या कामांचे अध्यादेश निघाल्याने निधी मिळाला. त्या कामांबरोबर आणखी विकासाचा मोठा निधी आणता आला. लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव प्रत्येक मतदारसंघात निधी मिळतो. मी मुख्यमंत्री असताना पक्ष, गट-तट हा विचार बाजूला ठेवून निधीच्या कामात कुठेही दुजाभाव केला नाही.
यावेळी शिवाजी आत्माराम जाधव, वसंत जाधव, दिनकर उर्फ बाळूआण्णा जाधव, रणजित जाधव, माजी सरपंच बाबासाहेब जाधव, दिलीपराव डुबल, डॉ. विलासराव थोरात, सर्जेराव माने, कापीलचे उपसरपंच पराग जाधव, माजी सरपंच मोहनराव जाधव, गोकाकचे संचालक वसंतराव देशमुख, माजी अध्यक्ष भरत पाटील, प्रल्हाद देशमुख, अशोक जाधव, जयवंत जाधव, सागर पाटील, अंकुश देशमुख, तानाजी गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहकारातून राजकारण करणार्यांचे ध्येय वेगळे : आ. पृथ्वीराज चव्हाण
RELATED ARTICLES