कराड: कराडला रविवारी व गुरूवारी शेतकरी रस्त्यावर, तर भाजीविक्रेता इमारतीत भाजी विकण्यास बसत असल्याचे दिसते आहे. मंडईची व्याप्ती मागील दोन वर्षापासून वाढते आहे. मात्र त्याचे नियोजन होताना दिसत नाही. मंडईसाठी कोटयावधींचा खर्च घालुन बांधलेल्या इमारतीचा वास्तुत: प्रत्यक्ष शेतकर्यांना काहीच उपयोग झालेला नाही. रस्त्यावर भाजी मंडईची व्याप्ती वाढली आहे. ती वाहतुकीच्या कोंडीत भर स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरते आहे. येथील भाजी मंडईचा विस्तार व व्याप्ती वाढत आहे. त्याच्या नियोजनात पालिकेला अपयश येत आहे. त्यामुळे वाढणारी भाजी मंडई शहरातील वाहतुकीवर परिणाम करत आहे.
कोटयावधंींचा खर्च घालुन बांधलेली भाजी मंडईची इमारत शेतकर्यंासाठी देण्यातही पालिकेला अपयश आले आहे. शेतकर्यांना रस्त्यावरच दुकान थाटावे लागत आहे. शेतकर्यांना मुळच्या भाजी मंडईच्या आसपासही फिरून दिले जात नाही.
काही ठरवाविक लोकांचीच मक्तेदारी तेथे चालते. तरीही पालिका त्यातील जबाबदार घटक त्याकडे ढुंकूनही पाहताना दिसत नाहीत. त्या निमित्ताने होणारी वाहतुकीच्या कोंडीकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे. भाजी मंडईच्या व्याप्तीला जबाबदार असल्याचे पालिकेने काही वर्षांपूर्वी येथे भाजी मंडईची इमारत उभा केली. शेतकर्यांची व विके्रत्यांची सोय करण्यात येणार होती.
मात्र, प्रत्यक्षात त्यांचे नियोजन झालेले नाही. त्यामुळे त्या वास्तुता काही ठराविक लोकांची मक्तेदारी सुरू आहे. त्यामुळे शेतकरी गेला, की तेथून हुसकावले जाते. त्यामुळे शेतकरी विक्रेत्याला येथे कोणीच वाली नाही, अशी अवस्था झाली आहे. त्याचा परिणाम शेतकरी रस्त्यावर बसू लागला. बसता बसता शेतकर्यंानी शहरातील मुख्य मार्गाच त्यंानी काबीज केला आहे. भाजी मंडईपासून रस्त्यात बसणारे विक्रेते बुधवार पेठ, महात्मा फुले पुतळा, बुरूड गल्ली, रैनाक गल्लीपासुन थेट डॉ. बापुजी साळुंखे यंाच्या पुतळ्यापर्यंत बसतात. शेतकरी बसतात. तो मार्ग शहरातील मुख्य रस्त्याला पर्यायी आहे. मेन रोडला कोंडी झाली की याच मार्गाने पर्यायी वाहतुक व्यवस्थित सुरू असते. तो मार्ग शहरातील सगळ्या भागात जातो. तोच विक्रेत्यांमुळे कोंडीत अडकतो आहे. त्यावर पालिकेने लवकरात लवकर उपाय न शोधल्यास किंवा शेतकर्यांना पर्याय न दिल्यास स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.
भाजी मंडईचे नियोजन कोलमडले कराडला रविवारी व गुरूवारी शेतकरी रस्त्यावर, तर भाजी विके्रता इमारतीत
RELATED ARTICLES