कराड: अतिवृष्टीने भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील होलसेल भाजी मार्केटमध्ये आवक घटली असल्याने मंडईतील भाज्यांचे दर कडाडले आहेत. कांदा, लसणाने उचांक गाठला आहे. या एकूणच वाढलेल्या भाजी पाल्यांच्या दरामुळे गृहीणींचे बजेट कोडमडले आहे.
यावर्षी जून महिण्यात पावसाची सुरुवात झाली. तो दिपावलीपर्यंत सुरूच होता. प्रत्येक वर्षापेक्षा पाऊस यावर्षी अतिरीक्त झाला. त्यामुळे हातातोंडाला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातून भाजीही सुटली नाही.
शेतातील पालेभाज्यांना गरजेपेक्षा जास्त पाणी झाल्याने शेतातच भाजीपाला कुजला. त्यामुळे बाजारातील भाजीपाल्यांची आवक मंदावली आहे. परिणामी भाज्यांचे दर वधारले आहेत.किरकोळ भाजी मंडईत वांगी, दोडका, घेवडा, शेवगा, गवारी, मुळयाची शेंग व इतर फळभाज्यांचा दर 20 रुपये पावशेर तर 80 ते 90 रुपये किलो झाला आहे. मेथी, पालक, तांदुळ, आंबाडा, शेेप्पू चाकवत, अंबट चुका या भाज्यांचे 1 पेंडी 10 ते 15 रुपयाला विकली जात आहे.
बाजारातील कोबू, फ्लॉवरची आवक घटल्याने कोबू व फ्लॉवरचा दर 20 ते 25 रुपये आहे. नविन कांद्याचा दर 50 रुपये आहे. तर जुन्या कांद्याचा दर 60 ते 70 ने वाढला आहे. लसणाच्या दराने कहरच केला आहे. त्याचा किलोचा दर 200 रुपये झाला आहे. अशा दैनंदिन वापरातील वस्तुंच्या किमतीत वाढ झाल्याने नागरिक महागाईने त्रस्त झाले आहेत.
बाजारातील पालेभाज्यांचे दर कडाडले : गृहिणींचे बजेट विस्कळीत
RELATED ARTICLES