Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीप्रहारच्यावतीने संतप्त उद्योजकांचा विज वितरणवर मोर्चा 15 दिवसांत विज पुरवठा सुरळीत झाला...

प्रहारच्यावतीने संतप्त उद्योजकांचा विज वितरणवर मोर्चा 15 दिवसांत विज पुरवठा सुरळीत झाला नाहीतर तीव्र आंदोलनाचा इशारा

कराड : ओगलेवाडी (ता.कराड) येथील औद्योगीक वसाहतीत वारंवार विज पुरवठा खंडीत होत असल्याने संपत्प झालेल्या उद्योजक व कर्मचार्‍यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातुन वितरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. येत्या पंधरा दिवसांत विज पुरवठा आखंड व सुरळीत झाला नाही तर तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा प्रहारचे जिल्हाध्यक्ष अजितराव बानगुडे यांनी दिला आहे.
प्रहार संघटनेच्या वतीने संतप्त उद्योजक व कर्मचार्‍यांचा औद्योगीक वसाहतीपासुन विज वितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अजितराव बानगुडे , मनोज माळी महेश शिंदे, आबा इनामदार, शेखर कलबुर्गी, श्रीधर कलबुर्गी प्रदिप शिंदे, संदीप कोटणीस, मनोहर वंजारी, शौकत पटेल, राजाराम मुळीक, अरुण कणसे, अद्योजक व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी अजितराव बानगुडे म्हणाले की, औद्योगीक वसाहतीत वारंवार विज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे उद्योजकांचे नुकसान होत आहे. दिवसातुन तासन तास विज गायब होत आहे. चालु कामात अचानक विज पुरवठा बंद झाल्याने सिएनसी सारख्या महागडया मशिन नादुरुस्त होत आहेत. मशिनमध्ये अर्धवट जॉब अडकल्याने नुकसान होत आहे. एकीकडे आर्थिक मंदीमुळे उद्योग अडचणीत आले असतानाच वीज वितरणाच्या भोंगळ कारभारामुळे ओगलेवाडीतील औद्यागीक वसाहत बंद पडणाच्या मार्गावर आहे. याबाबत अनेकदा वीज वितरणकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र सुधारणा होत नाही. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत विज पुरवठा सुरळीत झाला नाही, तर प्रहारच्या माध्यमातुन वीज वितरण विरोधात तिव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा अजितराव बानगुडे यांनी दिला. संदीप कोटणीस म्हणाले की, ओगलेवाडीत परीसरातील उद्योजक विज बीलाच्या माध्यमातून मोठा महसुल विज वितरणाला देतात, मात्र विज वितरणकडुन उद्योजकांना त्याप्रमाणात सेवा मिळत नाही. विज वितरणकडुन कुठल्याही नविन नियम अथवा बदलाची माहिती येत नाही. रात्री अपरात्री विज पुरवठाबंद झाल्यानंतर कार्यालयात कोणी फोन उचलत नाहीत. दिवसपाळी.रात्रपाळीला कोण कर्मचारी आहेत याची माहिती नसल्याने उद्योजकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे विज वितरणने यात सुधारणा करावी. उद्योजकांना अखंड व सुरळीत विज पुरवठा करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना राबवावी अशी मागणी संदीप कोटणीस यांनी केली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular