कराड: स्वयंपाक घरातील नेहमी वापरात असणार्या कांदयाच्या दराने उचांकी दर पातळी गाठली आहे. बाजारात कांदयाचा दर 120 ते 150 रुपये झाला आहे. तर फोडणीसाठी वापरला जाणारा लसनाने 160 ते 200 रुपयाची पातळी गाठली आहे. त्यामुळे गृहणींच्या स्वयंपाकाची चव बदलली आहे.
हॉटेल, खानावळ, हातगाडे तसेच घरातील कांदा, लसून गायब झाला आहे. त्याची जागा आता कोबीने घेतली आहे. यावर्षी अधिकच्या पावसाचा तडाखा भाजी पाल्याला बसला आहे. गेल्या आठवडयात कोथंबीरीच्या पेंढीचा भाव 90 रुपयावर गेला होता. मात्र या आठवडयात कोथंबीरीचे दर खाली आले आहेत. बाजारात कोथंबीर पेंढीचा दर 10 ते 15 रुपये आहे. कोबी दर स्थीर झाला आहे. तो 20 ते 25 रुपये कीलो भावाने विकला जात आहे. पालक, चाकवतीची पेंढी 10 ते 15 रुपयाला आहे. कांदा पात बाजारात उपलब्ध झाली आहे, मात्र तीचे प्रमाण कमी असल्याने ती चढया भावाने विकली जात आहे.
मात्र लिंबवाचे दर पडले आहेत, ते 10 रुपयाला 5 मिळत आहेत. आल्याचा दर 60 ते 70 रुपये किलो आहे. वांगी गवार, दोडका, वाटाणा, पावटयाचा दर 80 रुपये किलो आहे. डाळींब, सफरचंदचा दर 80 ते 100 रुपये किलो आहे. संष्याला मार्केट नाही.
बोरे 40 रुपये किला आहेत. मात्र केळीचा भाव वधारला आहे. 40 ते 50 रुपये डझनाने विक्री चालू आहे. टॅमोटोचे दर उतरले आहेत. डाळया महागल्या आहेत.
कांदा, लसूण, भाजीपाल्याचे दर आवाक्याबाहेर
RELATED ARTICLES