कराड : यशवंतनगर (ता.कराड) येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. निवडणुकीसाठी एकुण 167 अर्ज दाखल झाले आहेत. सोमवार (दि.13) रोजी छाननी होणार आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत मंगळवार (दि.28) पर्यंत असून यादिवशी चित्र स्पष्ट होणार आहे
सह्याद्रि कारखान्याचे नेतृत्व आ.बाळासाहेब पाटील हे करत असून त्यांची नुकतीच राज्याचे सहकार मंत्री व जिल्ह्यचे पालकमंत्री म्हणून निवड झाली आहे. गुरूवारी कराड गटातून त्यांनी आपला अर्ज दाखल केला होता. गुरूवारी 22 अर्ज दाखल झाले होते. शुक्रवारी 145 अर्ज दाखल होऊन एकुण आकडा 167 वर पोहोचला आहे. त्यामुळे नवीन प्रशासकीय इमारतीतील निवडणूक कार्यालयात दिवसभर उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. दाखल झालेल्या अर्जामध्ये बहुसंख्य आज ना.बाळासाहेब पाटील समर्थकांचे आहेत. इच्छुकांना अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत.
कराड गट 1 मधून 15, तळबीड 2 मधून 25, उंब्रज गट 3 मधून 24, कोपर्डे हवेली गट 4 मधून 26, मसूर गट 5 मधून 25, वाठार गट 6 मधून 28 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
महिला प्रवर्गाच्या 2 जागांसाठी 10 अर्ज दाखल झलो आहेत. अनुसूचित जाती गटातून 6, विमुक्त जाती गटातून 3, इतर मागास वर्ग गटातनू 5 अर्ज दाखल झाले आहेत. एकूण 21 जागा निवडून आणावयाच्या आहेत.
छाननी सोमवार (दि.13) रोजी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत मंगळवार (दि.28) पर्यंत आहे त्यानंतर 9 फेब्रुवारीला मतदान होणार असून 10 रोजी मतमोजणी होणार आहे.
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीसाठी एकूण 167 अर्ज
RELATED ARTICLES