कराड : ढेबेवाडी पासुन 5 कि.मी. वरील वाल्मिकी पठाराखालील डोंगर कपारीत वसलेल्या आंब्रुळकरवाडी भोसगांव ता. पाटण येथे तिव्र पाणी टंचाई मुळे डिसेंबर 2018 मध्येच टँकरची मागणी केली आहे, पण अद्याप यंत्रणेने या मागणीकडे गांभीर्याने पाहिले नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
सध्या ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. दिवसाला 2 ते 3 घागरीसुध्दा पाणी मिळत नाही. गाव डोंगर कपारीत उंचावर असल्याने पाण्याचे कोणतेही स्त्रोत उपलब्ध नाहीत. त्यामुळे येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
चालु वर्षी बर्यापैकी पाऊस झाला असला तरी परतीच्या पावसाने दिलासा दिला नाही. आता कडक उन्हाळा असल्याने डोंगरावरील पाण्याची पातळी खालावली आहे. गावामधील सर्व पाण्याचे स्त्रोत कमी झाले आहेत. त्यामुळे पाणी टंचाई मोठया प्रमाणात जाणवत आहे. ग्रॅव्हीटी पध्दतीने नळपाणी पुरवठा योजनेद्वारे पाणी आणुन एका टाकीमध्ये जमा करून गावाला पाणी पुरवठा केला जातो.
परंतु दरवर्षी डिसेंबर मध्ये पाणी स्त्रोत आटतो. नळ योजना बंद पडते. गावामध्ये बोअरवेल, आड, विहीर असे पर्याय आहेत. परंतु त्याचे पाणीही डिसेंबर, जानेवारीतच कमी येते. चार दिवसात जेवढा पाणीसाठा होतो त्यातुन काही कुटुंबाचा पाणी प्रश्न एक दोन दिवसा पुरता सुटतो. नंतर सर्वांनाच टंचाईला सामोरे जावे लागते.
गावामध्ये दोन बोअरवेल आहेत. त्याचीही पाणी पातळी खोलवर गेली आहे. त्यामुळे हातपंपही चालत नाहीत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रतिवर्षी निर्माण होतो. शासनाकडुन उशिरा का होईना पण टँकरने पाणी पुरवठा होतो. पण असे आणखी किती दिवस चालणार? डोंगर पायथ्याशी वांग- मराठवाडी धरण आहे. त्यात बारमाही पाणी साठा धरण आहे. त्यात बारमाही पाणीसाठा असतो. तिथुन नळपाणी पुरवठा योजना राबवुन शासनाने गावाचा पाणीप्रश्न कायमचा निलामी काढावा अशी मागणी ग्रामस्थंामधुन होत आहे.
गावची लोकसंख्या 530 आहे. गाई, म्हशी, शेळया, कोंबडया अशी 500 जनावरे आहेत. ग्रामपंचायती मार्फत डिसेंबर महिन्यांमध्येच गावास पाण्याचा टँकर मिळावा यासाठी निवेदन दिले आहे. मार्च संपत आला तरी अद्याप कोणतीच व्यवस्था करण्यात आलेली नाही. संबंधित यंत्रणा याकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आंब्रुळकरवाडीत भासु लागले उन्हाळयाचे चटके
RELATED ARTICLES