कराड: गेल्या आठवडाभरापासुन वातावरणात कमालिचा उष्मा वाढला आहे सकाळ, सायंकाळ वार्याची झुळुक असते मात्र 10 वाजल्यापासुन वातावरण कमालीचे तापले आहे. कराड, तालुक्यात 30 अंश सेल्सीयस तापमाने आहे.
गेली आठवडा झाला. वातावरणातील तापमान वाढत चालले आहे या तापमानाचा परिणाम मनुष्य जीवनासह वन्यजीव पशुपक्षावर झाला आहे. अजुन पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवत नसली तरी तालूक्याच्या काही भागात थोडयाच कालावधीत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. सहया शहरासह तालुक्यात 30 अंश सेल्सयस तापमान झाले आहे.
या वाढत्या तापमानाच्या वचावासाठी विजेचा वापर वाढला आहे. प्रत्येक ऑफिस कार्यालये तसेच निवासस्थातील पंंखे, एसी, कुलर, कार्यरत झाले आहेत शहरातील शितपेयांच्या दुकानातीत गर्दी वाढु लागली आहे. दुपारच्या प्रहरी शहर व ग्रामीण भागातील वहातुकीवर परिणाम झाला आहे. तालुक्यातील विहीर पाझर तलाव धरणात पाणी साठा आहे. त्यामुळे नागरीकांना जनावरांना पक्षांना अजुन पिण्याच्या पाण्याची झाळ गसलेली नाही मात्र विजेच्या जादा वापराने नागरिकांच्या वीज बीलात मोठी वाढ झाली आहे.
कराड तालुक्यात उष्णतेचा पारा वाढला
RELATED ARTICLES

