कराड: मोदी सरकारच्या कणखर नेतृत्वामुळे भारतीय जवानांनी बालाकोट येथे केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये शेकडो दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. देशाच्या सुरक्षेसाठी झालेला हा महत्वाचा सर्जिकल स्ट्राईक सार्या जगाने मान्य केला असतानाही, त्याबाबत पुरावा मागणारे आणि पाकिस्तानची भाषा बोलणारे काँग्रेसचे आमदार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे खर्या अर्थाने देशद्रोही आहेत, अशी टीका श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांनी केली. शिवसेना-भाजपा व मित्रपक्ष महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ कराड दक्षिणमध्ये आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ कराड दक्षिण मतदारसंघातील वारूंजी, कोळे, उंडाळे, रेठरे बुद्रुक, सैदापूर या जिल्हा परिषद गटांमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर उमेदवार श्री. पाटील यांच्यासह राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
देशाच्या संरक्षणाची आणि सार्वभौमत्वाची काळजी असणार्या शिवसेना-भाजपा युतीला निवडून देणार की देशाच्या कामगिरीवर शंका घेणार्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला निवडून देणार? असा सवाल उपस्थित करत ना. डॉ. भोसले यांनी आघाडीच्या देशद्रोही भूमिकेवर सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे काम केले. मराठा आरक्षण देण्याचे ऐतिहासिक धोरण याच राज्यसरकारच्या माध्यमातून झाले. या निवडणुकीसाठी विरोधक एकवटले आहे. ज्या माजी मुख्यमंत्र्यांना मराठवाडी धरणाचा प्रश्न सोडविता आला नाही, ते मात्र राफेलवर गप्पा मारत आहेत. काँग्रेसने तर देशद्रोहाचे कलम वगळणार असल्याचे आपल्या जाहीरनाम्यातच म्हटले आहे. त्यामुळे अशा देशद्रोही वृत्तीच्या आघाडीला हद्दपार करून, विकासाची दृष्टी असणार्या शिवसेना-भाजपा महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
ना. शेखर चरेगावकर म्हणाले, काँग्रेस-राष्ठ्रवादीच्या नेत्यांनी विकासाच्या वल्गना करत जनतेची दिशाभूल केलेली आहे. विद्यमान खासदार हे आपल्या विचारांचे नाहीत, तरीही भाजपा सरकारने सातारा जिल्ह्यातील रस्त्यांसाठी साडेअकरा हजार कोटी रूपयांचा निधी दिला आहे. राष्ट्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची असून, देशात नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी सातारा मतदारसंघातून नरेंद्र पाटील यांना विजयी करा.
अकार्यक्षम खासदारामुळे सातारा जिल्ह्याचा विकास खुंटला असून, जिल्ह्यात नवनव्या उद्योगांची उभारणी, रोजगार निर्मिती, पर्यटनाला चालना देण्यासाठी मी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी केले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नितिन काशीद, उपतालुकाप्रमुख काकासाहेब जाधव, कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, जि.प. सदस्या सौ. शामबाला घोडके, कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, निवासराव थोरात, माजी संचालक श्रीरंग देसाई, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब निकम, मोहनराव जाधव, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष संजय पवार, पैलवान धनाजी पाटील, कोयना वसाहतीचे सरपंच राजेंद्र पाटील, रेठरे बुद्रुकच्या सरपंच सुवर्णा कापूरकर, भीमराव कळंत्रे, रामभाऊ रैनाक, दाजी जमाले, रमेश लवटे, सुदर्शन पाटसकर, नितीन पवार, प्रमोद पाटील, भूषण जगताप, पंकज पाटील, संजय शेटे, सुनील जाधव, हरीभाऊ शेवाळे, व्ही. के. मोहिते, शिवाजीराव दमामे, नारायण शिंगाडे, अरूण सावंत, महेश चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देशद्रोही : ना. डॉ.अतुल भोसले
RELATED ARTICLES

