ओगलेवाडी : तरूणाईची शरिर संपदा चांगली राहावी गावच्या एखाद्या-दुसर्या तरूणांने पैलवान होऊन गावाबरोबरच परिसराचे नाव चमकवावे. या हेतुने हजारमाची ता. कराड येथील गावकर्यांनी पुढाकार घेवुन गावात तालिम बांधली या घटनेला जवळपास 50 वर्षे झाली आहेत. त्याच तालिमेकडे कोणी लक्ष न दिल्याने या तालमेची इमारत आज दैयणीय अवस्था झाली आहे. तेंव्हा या तालमीची देखभाल करून ती पुर्ववत करावी अशी नागरीकांतुन मागणी होत आहे.
हजारमाचीच्या तालमीने गावातील तरूणांची शरीर संपदा तंदुरूस्त ठेवली होती. याच तालमीत अनेक छोटे पैलवान घडले. त्यात पै. राम वंजारी, पै.दत्तोबा ढापरे, पै. लक्ष्मण पवार, पै.जे.पी.पाटील, पै.आर. पी. पाटील, पै.भीमराव पवार, पै.सतिश पवार, पै. आकाराम पवार, पै.वसंतराव डुबल, यांच्यासह इतरांचा समावेश होता. या घडलेल्या पैलवानांनी गाव तालुका, जिल्हयाबरोबरच राज्य पातळीवर नावलौकीक मिळविला. हा या तालमीचा इतिहास असताना आज या तालमीकडे कोणी लक्ष देत नाही त्यामुळे तिची अवस्था दैयणीय झाली आहे.
आखाडयात माती नाही. इमारतीच्या भोवती झाडझुडुपे गवताची उगवन झाली आहे. दारे, खिडक्या खिळखिळया झाल्या आहेत. त्यामुळे पैलवान बनण्याची इच्छा असुनही गावातील तरूणांना तालीम नाही. गाव -विभागात काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचे प्राबल्य आहे. अलिकडेच भाजप-सेनेनेही पाय रोवले आहेत. आर.पी. आय. सारखी कनखर संघटना आहे.
या बरोबरच छोटया मोठया विचारांचे संघटनाही आहेत. गावची ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यात आहे. उत्तरचे आमदार राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील आहेत. मात्र गावातील या तालमीच्या प्रश्नाकडे वेळ द्यायला कोणाकडेच सवड नाही. प्रत्येकजन आपआपल्या गटा-तटाचेे राजकारण करत आहेत. मात्र गावातील प्रश्नांचे कोणालाच गांभीर्य नाही. त्यामुळे गावचे अनेक प्रश्न जटील बनले आहेत. तेंव्हा सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्याचा विचार करणे गरजेचे आहे.
श्रेयवादाच्या भोवर्यात अडकलीय हजारमाचीची तालीम
RELATED ARTICLES