कराड: चार दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला असून दिवसा रखरखते उन्ह व सायंकाळी ढग येत असल्याने वातावरणात उष्मा वाढला आहे. सुर्य आग ओकत असताना आणि उष्णतेचा पारा वाढत असताना लोक उकाडयाने अक्षरश: हैराण झाले आहेत. दुपारी रखरखत्या उन्हात बाहेर पडणे अवघड झाले आहे.
दुपारची रस्त्यावरील वाहतुकही रोडावली आहे. रखरखत्या उन्हापासुन संरक्षण करताना रूमाल, छत्री, टोप्या याचा वापर नागरिक करताना दिसत आहेत. कडक उन्हामुळे जीवाची काहिली होत आहे. दिवसभर लोक घामाने डबडबत आहेत. या उष्माचा त्रास लहान मुले व वृध्दांना अधिक होत असून त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.
सायंकाळी ढग येत असल्याने उष्मा त्रास लहान मुले व वृध्दांनां अधिक होत असुन त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. सायंकाळी ढग येत असल्याने उष्मा अधिकच जाणवत आहे. दोन दिवसांपुर्वी कराड तालुक्यातील दक्षिण विभागात पावसाचा शिडकावा झाला होता. मात्र मुसळधार पाऊस न झाल्याने विभागात पावसाचा शिडकावा झाला होता. मात्र मुसळधार पाऊस न झाल्याने वातावरणात उष्मा अधिकच जाणवू लागला आहे. नागरिक मोठया पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. चार दिवसांपासुन उष्मा अधिकच वाढला आहे. चार दिवसांपासुन उष्मा अधिकच वाढला पाराही वाढला असुन लोक त्रस्त झाले आहेत. रात्रीही वातावरणात उष्मा जाणवत आहे.
वाढत्या उष्णतेबरोबर लहान मुले, वृध्दांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या
RELATED ARTICLES