कराड: कृष्णा घाटाकडील प्रीतिसंगम उद्यानाबाहेर होणार्या वाहनांच्या कोंडीवर पालिकेने उपाय राबवत वाहनांचे पार्किंग बंद केले आहे. वाहनांचे पार्किंग अन्यत्र केल्यामुळे कृष्णाघाट परिसरात वाहनांच्या प्रवेशाला बंदी घातली आहे. त्यामुळे घाटावर फिरायला येणार्यांना त्याचा त्रास कमी झाल्याचे दिसते आहे. पालिकेच्या निर्णयाचे नागरिकातुन स्वागत होत आहे. पालिकेने येथे होणारी गर्दी लक्षात घेऊन सायंकाळी सहा ते रात्री साडेनऊ पर्यंत वाहनांना प्रवेशबंदी जाहीर केली आहे.
शहरातील ऐतिहासिक कृष्णाघाट, भुईंकोट किल्ला, कृष्णा, कोयना नद्यांचा प्रीतीसंगम, ज्येष्ठ नेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधी आणि प्रीतिसंगम उद्यान पाहण्यासाठी कानाकोपर्यातुन पर्यटक दाखल होतात. त्यांचा राबता बारमाही झाला आहे. उन्हाळी सुटयांमध्ये ती गर्दी मोठी होते. त्यामुळे परिसराचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यटनासाठी येणारे बहुतांश नागरिक अपली वाहने घेऊन येतात. त्यात चारचाकी व दुचाकी वाहनांचा समावेश असतो. त्यामुळे घाट परिसरात पाकिर्ंगची समस्या निर्माण झाली आहे. पार्किंगसाठी आखण्यात आलेले पट्टे अपुरे पडु लागल्याने जागा मिळेल तेथे पर्यटक वाहने लावतात. परिणामी घाट परिसरात वाहतुक कोंडी डोकेदुखी बनली होती. वाहन लावणे व काढण्याच्या कारणामुळे वादावादी होत होती.
गर्दीतुन वाट काढत घोडेस्वारी, लहान मुलांच्या रिमोटवरील गाडयांचा व्यवसाय करणारे व्यावसायिक रपेट मारतात, असे विचित्र स्वरूप दिसत होते.
काही धुमस्टाईल वाल्यांचीही तेथे डोकेदुखी होती. त्यामुळे अपघाताचीही शक्यता होती. त्यावर ठोस उपायांची गरज होती. त्या सगळया गोष्टी लक्षात घेऊन पालिकेने कृष्णाघाट परिसरात सायंकाळी चारचाकी व दुचाकी वाहनांना प्रवेश बंद केला. तो निर्णय महत्वपुर्ण ठरला आहे. निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याचे नागरिकांनी स्वागत केले.