कराडः ओंडसह विभागातील डोंगरी भागात पाणी हा मुख्य प्रश्न आहे. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत गांभीर्याने लक्ष दिले आहे. ओंडच्या तलावात याआधी येवतीच्या धरणातून पाणी यायचे. परंतु तलावापासून खालील भाग गेल्या चाळीस वर्षांपासून पाण्यापासून वंचित होता. ही बाब पृथ्वीराजबाबांच्या निर्दशनास आणल्यानंतर ग्रामस्थांच्या मागणीवरुन येवतीच्या धरणातून ओंडच्या उर्वरित लाभक्षेत्रात पाणी आणले आहे.
त्यामुळे या विभागात नंदनवन फुलणार आहे. असे प्रतिपादन युवा नेते इंद्रजीत चव्हाण यांनी केले. ओंड (ता. कराड) येथे उभारलेल्या सिमेंट बंधाऱयात येवती धरणातूत आलेल्या पाण्याचे पूजन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. जेष्ठ नेते सर्जेराव शिंदे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस पैलवान नानासाहेब पाटील, शिवाजीराव मोहिते, नितीन थोरात, बाजीराव थोरात, ओंडचे माजी उपसरपंच कृष्णत थोरात, संतोष थोरात, प्रविण थोरात, गुलाब थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
इंद्रजीत चव्हाण म्हणाले, ओंडच्या तलावापर्यंत आजअखेर येवतीच्या धरणातून पाणी यायचे. परंतु उर्वरित लाभक्षेत्रास पाण्यापासून वंचित रहावे लागायचे. ही बाब आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या निर्दशनास आल्यानंतर त्यांनी प्राधान्याने याकामी लक्ष दिले. त्यांच्या सूचनेवरुन सिमेंट बंधाराही उभारला गेला आहे. त्यामध्ये धरणातील पाणी आणल्याने या विभागाचे नंदनवन होईल.
कृष्णत थोरात म्हणाले, याआधी कधीच या विभागात धरणाचे पाणी आले नव्हते. पृथ्वीराजबाबांनी प्राधान्याने याकामी लक्ष दिल्यामुळे लाभक्षेत्रात पाणी पोहचले आहे. याचा सुमारे 300 एकर शेतीला उपयोग होणार आहे. कृष्णत थोरात यांनी स्वागत केले.
पृथ्वीराजबाबांमुळे ओंडच्या डोंगरी भागाचे नंदनवनः इंद्रजीत चव्हाण
RELATED ARTICLES