कराड: जैवविविधता मानवाचे जीवन आहे. जैवविविधतेशिवाय काहीही शक्य नाही. पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणी जैवविविधता आहे. अनेक प्रजाती एक दुसर्यांवर अवलंबून आहेत. त्यामुळे जैवविविधता संरक्षण आणि संवर्धन प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन रयत विज्ञान परिषदेचे समन्वयक, पर्यावरण अभ्यासक डॉ.सुधीर कुंभार यांनी केले.
ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेमध्ये जागतिक जैवविविधता दिनानिमित्त आयोजित जैवविविधता संवर्धन परिसंवाद व पर्यावरण तज्ञ डॉ.सुधीर कुंभार यांच्या लिम्का बुक ऑङ्ग रेकार्ड झालेल्या निसर्गज्ञान भित्तीपत्रकाचे प्रदर्शन आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एन्व्हायरो ङ्ग्रेंड्स नेचर क्लबचे अध्यक्ष जालिंदर काशिद, ज्ञानदीपचे अध्यक्ष आनंदा थोरात, संचालक संभाजी जमाले, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ सांगली कॅम्पसच्या समाजकार्य पदवीच्या विद्यार्थ्यांनी तेजस्वी ढापरे, आरती पवार, भाग्यश्री भोसले, ङ्गरहिन पटेल यांची उपस्थिती होती.डॉ.सुधीर कुंभार म्हणाले, सध्या आपण स्वत:च वन्यप्राण्यांच्या घरात (जंगलात) शिरत आहोत. त्यांना अडथळा निर्माण करीत आहोत आणि मग त्यांनी आमच्यावर हल्ला केला की, आम्हीच त्यांना ठार मारण्याची मागणी करतो. याशिवाय आपण निसर्गात कोणतीही प्रजाती उत्पन्न करू शकत नाही, त्यामुळे ती नष्ट करण्याचा सुद्धा आपल्याला कोणताही अधिकार नाही. आज जैवविविधतेला अनेक धोके आहेत. वातावरणातील बदल, प्रजाती नामशेष होणे, जंगलांचा र्हास हे सर्व जैवविधितेपुढील आव्हाने आहेत, यामुळेच ती टिकविण्याची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे केवळ कागदावर जैवविविधता व्यवस्थापन समित्या तयार करून चालणार नाही, तर जैवविविधतेचे जतन करण्यासाठी लोकसहभाग वाढविला पाहिजे.आनंदा थोरात म्हणाले, शहरीकरण, वाढत जाणारी लोकसंख्या, जंगलाची होत असलेली तोड, नष्ट होत चाललेले वन्यजीवांचे अधिवास, जैविक संपत्तीचा अमर्याद वापर यामुळे प्रत्यक्षअप्रत्यक्षपणे जैविक उत्पादने व साधनसंपत्तीवर अवलंबून असलेल्या लोकसंख्या तसेच एकूण जैवविविधतेच्या संपत्तीवर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळेच पर्यावरण व जैवविविधता संवर्धनासाठी सक्रिय लोकसहभाग आवश्यक आहे. यावेळी जालिंदर काशिद यांनी मार्गदर्शन केले. अर्चना पाटील यांनी संस्थेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या पर्यावरणपुरक आणि पर्यावरण संवर्धनासाठीच्या उपक्रमांची माहिती दिली. दरम्यान, संस्थेत डॉ.सुधीर कुंभार यांच्या हस्तलिखीत निसर्गज्ञान भित्तीपत्रकाचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.किशोर थोरात, वैशाली ताटे, सुवर्णा सुर्वे यांनी स्वागत केले. तेजस्वी ढापरे यांनी आभार मानले.
जैवविविधतेचे संवर्धन प्रत्येकाची जबाबदारी: डॉ.सुधीर कुंभार
RELATED ARTICLES