कराड : पर्यावरणदिन व रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर येथील नगरसेवक सुहास जगताप यांनी फुले व फळांच्या वृक्षांचे वाटप केले. ईदनिमित्त बंदोबस्तासाठी असणार्या पोलिस अधिकारी, कर्मचारी, तसेच नागरिकांना वृक्षांचे वाटप करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.
यावेळी सुहास जगताप म्हणाले, दिवसेंदिवस पर्यावरणाचा र्हास होत आहे. दरवर्षी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहूनही पाऊस हुलकावणी देत आहे.
वनसमृध्दी नष्ट झाली आहे हे एकमेव कारण असून यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या अंगणात, गच्चीवर तसेच परिसरात, डोंगरावर किमान एक तरी झाड लावावे. सध्या पर्यावरण चळवळ जोर धरू लागली आहे.
पर्यावरणाचे महत्व नागरिकांना समजत असले तरी रोपण केलेल्या वृक्षांचे जतन करणेही तितकेच आवश्यक आहे.
दरवर्षी सुहास जगताप यांच्याकडून पर्यावरण दिनानिमित्त 500 रोपट्यांचे वाटप विविध संस्था, नागरिकांना केले जाते. तसेच सण अथवा कार्यक्रमांना रोपटे देवून स्वागत करण्यात येत असून वृक्षारोपणाची चळवळ अखंड सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे, मिलिंद गरूड, चंद्रकांत काटवे, पंकज पावसकर, सतीश कणसे, महिला पोलिस कर्मचारी, उपस्थित होते.
नगरसेवक सुहास जगताप यांचेकडून वृक्षांचे वाटप
RELATED ARTICLES