कराड: मलकापुर नगरपरिषदेने समाजाभिमुख योजना राबवुन देशात नावलौकिक मिळवला आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विकास कामे करणार्यंाच्या हातीच मतदारांनी सत्ता देवुन दिशाभुल करणार्यंाना त्यांची जागा दाखविली आहे. त्याच पद्धीतीने येत्या दोन महिन्यात होवु घातलेल्या विधानसभा निवडणुकीत कार्यक्षम व निरपेक्ष नेतृत्व असलेल्या माजी मुख्यमंत्री विद्यमान आ. पृथ्वीराज चव्हाण यांना सहकार्य करून मतदांरांनी मलकापुरसारखीच हॅट्ट्रीक करावी असे अवाहन माजी गृहराज्यमंत्री आ. सतेज पाटील यांनी उपस्थितांना केले.
मलकापुर नगरपरिषदेच्या वतीने स्व.ना. आनंदराव चव्हाण व प्रेमलाताई चव्हाण (काकी) यांच्या पुण्यतिथी निम्मित विविध उपक्रमांचे आयोजन केले होते त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. यावेळी आ. पृथ्वराज चव्हाण, आ. मोहनराव कदम, आ. आनंदराव पाटील,युवा नेते उदयसिंह पाटील, जेष्ठ नेते अजितराव पाटील कृष्णा कारखान्यांचे माजी चेअरमन डॉ.इंद्रजीत मोहिते, शिवराज मोरे, मलकापुर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा निमल येडगे, जयवंतराव जगताप, अर्बन कुटूंब प्रमुख सुभाषराव जोशी, इंद्रजीत चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
आ. सतेज पाटील पुढे म्हणाले, स्व. आंनंदराव चव्हाण व प्रेमलाताई चव्हाण यांनी मलकापुरवर मोठे प्रेम केले त्यांचाच वारसा आज आ. पृथ्वीराज चव्हाण चालवित आहेत. आज जी मलकापुरची प्रगती झाली आहे. ती मनोहर शिंदे यंाच्यामुळेच याच विकासाच्या जोरावर त्यांनी मलकापुरचा गड शाबुत ठेवला. येत्या दोन महिन्यात विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल. या निवडणुकीतही जनतेने काम करणार्यंा आ. चव्हाण यंाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. नाहीतर लबाड लोक राजकारणात आले तर समाजाच्या विकास होणार नाही. मलकापुरची नगरपालिका व्हावी यासाठी मनोहर शिंदे प्रयत्नशील होते. मात्र दुसरीकडे मलकापुरची नगरपालिका न होता. नगरपंचायत रहावी यासाठी काहीजन शासन दरबारी प्रयत्न करून गावचा आम्ही विकास करू असे निवडणुकीत सांगत फिरत होते. हा येथील मतदारांनी अनुभव घेतला आहे. तेंव्हा अशा प्रवृत्तीला विधानसभेच्या निवडणुकीतही त्यंाची जागा त्यांना दाखवावी.
मलकापुर नगरपरिषदेने अनेक विकास योजना राबवुन देशात आदर्श निर्माण केला आहे. पालिकेला मनोहर शिंदे यांच्या रूपाने आयडॉल नेतृत्व लाभले आहे. ते पालिकेच्या माध्यमामातुन नवनविन योजना राबवून समाजउपयोगी कामे करत आहेत. असे सांगुन आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, जगाबरोबरच देशात प्रदुषणाचा प्रश्न मोठया प्रमाणात भेडसावत आहे. या प्रदुषणावर मात करण्याठी झाडे लावुन ती जगवण्याची गरज आहे. आज देेशासमोर अनेक गंभीर प्रश्न असताना सत्ताधारी मंडळी समाजकारण न करता पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे राजकारण करीत आहेत.
या वेळी आ. आनंदराव पाटील, अजितराव पाटील, सुभाशराव जोशी यांच्या सह इतर मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. तर उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
मलकापुर प्रमाणेच विधानसभेत हॅट्ट्रीक करावी :आ. सतेज पाटील
RELATED ARTICLES