कराड: पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीने आलेल्या पुरामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पूर ओसरल्यानंतर आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे, मात्र गरज आहे ती स्वछता अभियान राबविण्याची! याच भूमिकेतून भारतीय जनता पार्टी कराड दक्षिण आणि अतुल भोसले युवा प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वच्छतादूत बनून गावोगावी स्वच्छता अभियान राबविण्यास प्रारंभ केला आहे. या स्वच्छता मोहिमेमुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळत आहे.
पुरामुळे नदीकाठी हजारो टन मातीमिश्रित मैला, प्लास्टिकचा कचरा, बॉटल आदी कचरा साठला आहे. या कचर्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्याचबरोबर रोगराई पसरण्याचीही शक्यता आहे. यासाठी भारतीय जनता पार्टीचे कराड दक्षिणचे पदाधिकारी व अतुल भोसले युवा प्रतिष्ठान गेल्या आठवड्यापासून स्वच्छता मोहीम राबवत आहेत. यात आटके येथे स्मशानभूमी परिसर, नदी घाट इत्यादी भागाची स्वच्छता करण्यात आली आहे. तसेच कराड येथील शुक्रवार पेठेतील कोयनेश्वर मंदिर परिसरातही स्वच्छता करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे , ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, नगरसेविका सौ. विद्या पावसकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष संजय पवार, नगरसेवक सुहास जगताप, रामभाऊ रैनाक, पैलवान धनाजी पाटील, युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक पाटील, मुकुंद चरेगावकर, धनाजी माने, उमेश शिंदे, किरण मुळे, जमीर शेख, अभिजीत पाटील, दिलीप जाधव, प्रमोद शिंदे, राहूल भिसे, नथुराम कुंभार, विस्तारक सुनील शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
भाजपा व अतुल भोसले युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते बनले स्वच्छतादूत
RELATED ARTICLES