कराड : महिलांकडे असलेला सकारात्मक दृष्टिकोन नेहमीच प्रगतीची कास धरताना दिसतो. या महिला वर्गाचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रज्वला योजना राबविण्यात येत आहे. याच्या माध्यमातून बचत गटातील महिलांनी आर्थिक-सामाजिक विकासाबरोबरच सर्वांगिन विकास साध्य करावा, असे आवहन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ अतुल बाबा भोसले यांनी केले.
महाराष्ट्र राज्य महीला आयोग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि पंचायत समिती कराड यांच्या संयुक्त विद्यमाने कराड येथे प्रज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेचे उद्घाटन डॉ अतुल बाबा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बचत गटातील महिलांना मार्गदर्शन करत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रज्ज्वला योजना समितीच्या अध्यक्षा दिपाली मोकाशी होत्या. यावेळी सभापती फरिदा इनामदार उपसभापती सुहास बोराटे, माजी सभापती शालन माळी, पंचायत समिती सदस्य रमेश चव्हाण दयानंद पाटील प्राची पाटील जिल्हा परिषद सदस्य शामबाला घोडके, महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे, नगराध्यक्षा रोहिणी ताई शिंदे, नगरसेविका विद्याताई पावस्कर, कविता कचरे, मनीषा बर्गे, वर्षाताई डहाके, प्रकल्प अधिकारी लक्ष्मण मानकर, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी विशाल कोतागडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. भोसले म्हणाले, भारतीय कुटुंब संस्थेत महिलांना अनन्यसाधारण महत्त्व राहिला आहे. ज्या ठिकाणी आर्थिक व्यवहार महिला सांभाळतात त्याठिकाणी काटकसरी तून चांगल्या पद्धतीने कुटुंबाची उन्नती झाल्याची अनेक उदाहरणे पाहावयास मिळतात. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महिला आयोगाच्या माध्यमातून प्रज्वला योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे. महिला 100% कर्जाची परतफेड करतात हा माझा सहकारातील अनुभव आहे.
महिलांकडे राष्ट्र दृष्टिकोन असल्यामुळे मोदीजींनी निर्मला सीतारामन यांच्याकडे देशाच्या अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपवली आहे. या प्रशिक्षणातून महिलांचे सक्षमीकरण होण्याबरोबर त्यांचे कुटुंब उभे करण्यासाठी मोठा सातबारा प्रज्वला योजनेतून लागणार आहे. याबाबत महिलांनी सकारात्मक निर्णय घेऊन स्वतःबरोबर देशाच्या प्रगतीला हातभार लावावा.
एचडी दिपाली मोकाशी म्हणाल्या, महिलांवरील अन्याय-अत्याचार दूर करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या महिला आयोगाच्या माध्यमातून यापुढे त्यांचे सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याच उद्देशाने गेल्या दोन वर्षांपासून प्रज्वला योजनेचे काम चालू आहे. यातून महिलांना व्यवसाय उभे करणे उत्पादित मालाची विक्री करणे व सर्वांचे आर्थिक नियोजन करणे यासाठी सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात महिला प्रशिक्षण हाती घेण्यात आले आहे. नगराध्यक्षा रोहिणीताई शिंदे, सभापती फरिदा इनामदार प्राची पाटील यांनीही मार्गदर्शन केले. उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक निलेश पवार यांनी प्रास्ताविक केले. पुनम गायकवाड व पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. एकात्मिक बालविकास प्रकल्प परिवेक्षिका अरुंधती गरुड व अलका शेवाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तालुका व्यवस्थापक जयवंत दळवी यांनी आभार मानले.
महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रज्वला योजना:डॉ अतुलबाबा भोसले
RELATED ARTICLES