केळघर: नांदगणे येथे आज संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास वीज वितरण कंपनीचे पाच खांब पडून पाईपलाईनसह व गव्हाचे पीक जळून शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या धोकादायक खांबांबाबत वीज वितरण कंपनीने गांभीयार्ंने लक्ष्य न दिल्याने आजची घटना घडली आहे. या खांबांबाबत तसेच गावातील इतर गंजलेल्या खांबाबाबत ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीकडे तक्रार करूनही कायर्वाही न केल्याने वीज वितरण कंपनीच्या वेळकाढूपणापणाबद्दल शेतकरयांनी संताप व्यक्त केला असून एखादी मोठी दुघर्टना झाल्यावरच वीज वितरण कंपनीला जाग येईल असा असा सवाल शेतकर्यांंनी उपस्थित केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नांदगणे येथील लक्षमण हरिबा खाडे यांच्या शिवारात आज चार वाजण्याच्या सुमारास अचानक पूणर्पणे गंजलेल्या अवस्थेत असलेले वीजेचे पाच खांब एकामागोमाग जमिनीवर पडले. या पडलेल्या खांबांच्या तारांमध्ये वीजप्रवाह सुरू असल्याने शॉटसकीर्टमुळे शेतातील गवत, पालापाचोळ्याने पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. लगतच असणार्या शेतातील कूपनलिकेसाठी केलेली पाईपलाईन बांधाने जळत गेली.तसेच नुकताच काढलेल्या गव्हाचे पीकही जळू लागले.भातशेतीसाठी केलेली कवळे, पालापाचोळ्याला आग लागली. आग बघून शेतकर्यांनी धाव घेतली व आग विझवण्याचा प्रयत्न केला.परंतु कूपनलिकेचे पाईप जळाल्याने व वीजेचे खांब पडल्याने आग विझवण्यासाठी पाणी उपलब्ध होवू शकले नाही.त्यामुळे शेतातील पालापाचोळ्याच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी केला. वेळेच आग विझवली नसती तर आजूबाजूच्या गहू शेतीचे मोठे नुकसान झाले असते.येथील परिसरातील शिवारांमध्ये आज शेतकरी जर काम करत असते तर मोठी दुघर्टना झाली असती.
या धोकादायक खांबाबाबत वेळोवेळी माहिती देवूनही वीज वितरण कंपनीने वेळेत लक्ष्य न दिल्याने आजची दुघर्टना घडली असून वीज वितरण कंपनीने आतातरी जागे होवून धोकादायक खांब हटवावेत, तसेच नुकसानित शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नांदगणे येथे वीजेचे खांब पडून शेतीचे मोठे नुकसान
RELATED ARTICLES