केळघर: केळघर येथील श्री भैरवनाथ विद्यामंदिरमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढून गावात स्वच्छता आणि अहिंसेचा संदेश देण्यात आला.
केळघर येथील श्री भैरवनाथ विद्यामंदिरमध्ये आज सकाळी महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमा पूजन करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पूजनानंतर विद्यालयातील शिक्षक घार्गे यांनी मुलांना स्वच्छतेचा संदेश दिला. त्यांना आपला परिसर स्वच्छता आणि आरोग्य यांचे महत्व सांगितले.
तर त्यानंतर राजकिरण अहेर यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनातील महत्वाच्या घटनांवर प्रकाश टाकून गांधीजींचे जीवन महात्म्य सांगितले. तर त्यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांना भीमा माने यांनी तंबाखू मुक्ताची शपथ दिली. मुख्याध्यापक अशोक पवार यांनी महात्मा गांधींनी दिलेल्या अहिंसेच्या संदेशाचे महत्व पटवून दिले.
तसेच लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जय जवान जय किसान या मूलमंत्राचे महत्त्व कथन केले. यावेळी विद्यालयातील शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणार्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर गावात प्रभातफेरी काढण्यात आली. सूत्रसंचालन सूर्यकांत देवकर यांनी केले.
श्री भैरवनाथ विद्यामंदिरमध्ये महात्मा गांधी जयंती उत्साहात
RELATED ARTICLES