Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीअवेळी पावसामुळे भातपिके भुईसपाट

अवेळी पावसामुळे भातपिके भुईसपाट

केळघर : आज सायंकाळी चार वाजले पासून केळघर (ता. जावली) परिसरात सुरु झालेल्या जोरदार पावसाने भात झोडणी करणार्‍या शेतकर्‍यांची मोठी ताराबंळ उडाली.
सतत पडणार्‍या पावसामुळे जावली तालुक्यातील प्रमुख पीक असलेले भात या पिकाच्या रोपांची लागण करताना पडणार्‍या संततधार पावसातच बहुतांश या पिकाचे नुकसान झाले आहे. यामधून उरले-सुरले पिक पदरात पाडून घेण्यासाठी बळीराजा ऐन दिवाळी सोडून आपल्या कुटुंबास शिवारात राबत आहे. परंतु गेल्या पंधरा दिवसापासून पडणार्‍या अवेळी पावसामुळे भातपिके भुईसपाट झाली आहेत. त्या पिकाची कापणी करुन, भात झोडणी करुन, उरला- सुरला दाणा घरात येईल.
यासाठी बळीराजाचं अख्ख कुटुंब शिवारात भिजत धडपडताना दिसत आहे. पण दररोज येणार्‍या या पावसामुळे बळीराजाच्या उरल्या -सुरल्या आशाही भर पावसात वाहून जात आहेत. त्यामुळे बळीराजाला स्वत: च्या अन्न -धान्याबरोबरच जनावरांचा वर्षभरासाठी साठवून ठेवायच्या चार्‍याची (पेंडा) याची मोठी चिंता सतावत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular