खंडाळा: वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांनी आमदारकिची हॅट्रटीक साधली आहे. राष्ट्रवादी अडचणीत असताना त्यांनी चढत्या कमानीनुसार मताधिक्य घेतले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी ठसा उमटवला असून त्यांची मंत्रीमंडळात वर्णी लागावी अशी मागणी सातारा जिल्ह्यातून होवू लागलेली आहे.
दांडगा जनसंपर्क तसेच सातत्याने विकासकामांकडे लक्ष देणार्या आमदार पाटील यांचा महाराष्ट्रातील सर्वांत लांबचा पल्ला असणारा मतदार संघ आहे. भावकलवाडी (ता.खंडाळा) ते तापोळा (ता.महाबळेश्वर) हे सुमारे शंभर किलोमीटर अंतर आहे. एवढ्या मोठ्या विस्तीर्ण मतदार संघात संपर्क ठेवून लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आ.मकरंद पाटील, जिल्ह बँकेचे संचालक नितीन पाटील व मकरंद पाटील आणि त्यांचा मित्र परिवार सातत्याने प्रयत्न करित आहेत. राज्यातील राजकारणाला कलाटणी मिळाली असून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आल्याचे समाधान सामान्य जनतेला वाटत आहे. ही श्रींची इच्छा असल्यामुळे सत्तेपासून वंचित ठेवलेल्या सातारा जिल्ह्याला आता हक्काचा मंत्री मिळण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. शिवसैनिक आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते ही रथाची दोन चाके असून आता विकासकामाला गती मिळेल असे शिवसेना जिल्हाप्रमुख हणमंतराव चवरे यांनी स्पष्ट केले. तसेच आ.पाटील व शिवसेनेचे आ. शंभुराज देसाई यांना मंत्रीपद देवून सातारा जिल्ह्याचा सन्मान करावा, अशी मागणी केली आहे.
खंडाळा तालुक्यातील भावकलवाडी येेथे मार्केट कमिटीचे उपसभापती दादा बिचुकले, डॉ.वसंतराव दगडे, अभियंता अजित कोळपे, सरपंच मंदाकिनी बिचुकले, पोपटराव पवार, महेश सावंत, सुजाता दगडे, सोसायटी चेअरमन विनायक बिचुकले व मान्यवरांनी आ.पाटील व आ.देसाई यांना मंत्रीमंडळात घेण्याची मागणी केली आहे. यासाठी लवकरच राष्ट्रवादी पक्ष प्रमुख शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, संपर्क नेते नितीन बानुगडे पाटील यांची शिष्टमंडळ भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.
आ.मकरंद पाटील यांना मंत्री करण्याची सातारा जिल्ह्यातून मागणी
RELATED ARTICLES